विटा प्रतिनिधी
विट्याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर झाले. यामुळे विट्याच्या प्रगतीत भर पडणार आहे. यासाठी माजी आमदार अॅड. सदाशिव पाटील यांनी स्वप्न पाहिले होते. त्यासाठी प्रयत्न देखिल केले. त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. यामुळे आशिलांची सोय होणार आहे, असे मत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यक्त केले.
तत्कालीन आमदार अॅड. सदाशिवराव भाऊ पाटील यांनी २००५ साली विटा कोर्टाची इमारत मंजूर केली. त्याच्या बांधकामास सुरवात केली होती. भविष्यातील जिल्हा न्यायालयाची शाखा विटा न्यायालायात सुरु करता येईल. त्यातून विटा शहराचे अर्थकारण बदलेल, या विचाराने माजी आमदार सदाशिव पाटील यांनी विस्तारित इमारत उभा केली. जिल्हा न्यायालय सुरु करण्यासाठी होता. पाठपुरावा केला
न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी जागा उपलब्ध झाल्याशिवाय सेशन कोर्टाला मंजुरी मिळणार नाही, हि बाब समजल्यावर माजी आमदार अॅड. सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विटा नगरपरिषदेच्या माध्यमातून न्यायाधीशांच्या निवासस्थानासाठी ३० गुंठे जागा उपलब्ध करून दिली. विटा बार असोसिएशन यांनी उच्च न्यायालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मंजूर झाले आहे, असे वैभव पाटील यांनी म्हंटले आहे.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयास मंजुरी मिळाल्यामुळे खानापूर, आटपाडी, कडेगाव व पलूस या चार तालुक्यातील दिवाणी व फौजदारी दावे, जिल्हा न्यायालयात करायचे अपील आरोपींचे जामीन विट्यात होणार आहेत. यामुळे खानापूर आटपाडी तालुक्यातील लोकांना सांगलीला हेलपाटे मारावे लागणार नाहीत. आणि एकूणच चार तालुक्यातील लोकांची वर्दळ विट्याला वाढणार आहे. या कारणामुळे खानापूर तालुक्यातील व्यवसाय व उद्योगधंद्यात वाढ होणार आहे, असेही वैभव पाटील यांनी म्हंटले आहे.