नेवरी वार्ताहर
माजी मंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी पलूस- कडेगाव मतदारसंघात विकास कामाचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे मतदार संघ विकास कामात आघाडीवर आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्याप्रमाणे डॉ. विश्वजीत कदम हे देखील मतदारसंघाच्या चौफेर विकासाठी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी केले.
नेवरी (ता.कडेगाव) येथे माजी राज्यमंत्री व आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या मंडले वस्ती ते महादेव मंदिर रस्ता दुरुस्ती व सुधारणा करणे- १२.५६
लक्ष.
नवरी ते भिकवडी रस्ता दुरुस्ती व सुधारणा करणे.- २९.८५ लक्ष
मागासवर्गीय वस्ती मध्ये अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण व पेव्हिग ब्लॉक बसवणे- १५लक्ष या एकूण ५८ लाखाच्या कामाचे भूमिपूजन सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.नेवरी गावच्या सरपंच प्रमिला दत्तात्रय साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस इंद्रजित साळुंखे उपसरपंच राजाराम महाडीक सागरेश्वर सूतगिरणी चे संचालक शंकर महाडीक आदी उपस्थित होते. ते म्हणाले महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकालामध्ये तत्कालीन राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी कोट्यवधी रुपायचा विकास निधी खेचून आणला. त्यामुळे मतदारसंघातील गावागावात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. अशा रीतीने दिवंगत पतंगराव कदम यांची विकास कामाची परंपरा यांनी पुढे कायम चालू ठेवली आहे. त्यामुळे पलूस कडेगाव मतदार संघ आज राज्यात आघाडीवर आहे.
आता राज्यात सत्ता नसली तरी डॉ. विश्वजीत कदम यांच्या पाठपुरामुळे विकास कामात कुठेही खंड पडलेला नाही. गावागावात व वाडी- वस्तीवरील विकास कामे मार्गी लावण्यासाठी त्यांची सदैव धडपड सुरू आहे. तसेच शैक्षणिक सहकारी आधी विविध संस्थांच्या माध्यमातून पलूस- कडेगाव मतदार संघातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी कदम कुटूंबियांनी योगदान दिले आहे.
यावेळी बाळासो महाडीक, आत्माराम मंडले, अधिक महाडीक, शशिकांत महाडीक, हणमंत ननवरे,योगेश महाडीक,सुरेश सकट,गौरव महाडीक तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.