नांद्रे/प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिबीर व शेतकरी मेळावा नांद्रे येथील वसंत पाणी पुरवठा संस्थेच्या मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहत संपन्न झाला. पहिल्या सञात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यक्रत्याच्या उपस्थित शिबीर सुरू झाले. यावेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकार्यानी संघटानेचे विचार, पक्ष बांधणी, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आदी बाबत आपले विचार मांडले. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
शेतकरी मेळाव्यास संबोधित करताना राजू शेट्टी म्हणाले, एक रकमी एफआरपी घेतल्याशिवाय रखाने चालू देणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे शक्य आहे. तर सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना का नाही? असा सवाल त्यांनी यावेळी केला. नियमित कर्जभरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, ऊस काटेमारी रोखण्यासाठी साखर कारखान्याने वजन काटे आँनलाईन करावेत. ऊस तोडणी वाहतुकीसाठी पैसे मागणाऱ्या साखर आयुक्तांनी कारवाई करावी, अशा मागण्या करत शेतकऱ्यांना आर्थशास्ञांनुसार शेती करावी लागेल व आपल्या घामाचे पैसे मिळव्यासाठी एकञीत लढा दिला पाहिजे. तसेच साखर कारखान्यांनी एफआरपी द्यावीच लागेल. व ती घेतल्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, असा इशाराही यावेळी शेट्टी त्यांनी दिला.
कारखाने ऊसाच्या वाहनामागे 2 ते 3 टन काटामारी करत आहेत. एकूण सर्वच यंञणा शेतकऱ्यांना चारी बाजूने लूटत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना एकदिलाने एकञीत येऊन आपल्या घामाचे दाम घेण्यासाठी लढा तीव्र केला तरच ही यंञणा गुडघे टेकेल.
या प्रसंगी बोलताना संदीप राजोबा म्हणाले, स्वाभिमानीची बीजे ज्या भूमीत रूजली त्या नांद्रेच्या भूमीतून हा ऐतिहासिक शेतकरी मेळावा होत आहे. या भूमीतील विचार राज्यभर उठतात. साखरसम्राटानां शेतकऱ्यांच्या गुलामगिरीची चालू ठेवायची आहे. साखरसम्राटांचे मनसुबे मोडीत काढण्याकरिता नांद्रेकरांनी पुढाकार घ्यावा आसे आवहान केले.
महेश खराडे म्हणाले, एक रकमी एफआरपी देण्यास भाग पाडू. शेतकऱ्यांना प्रत्येकजण लुटत आहे. जगायला आलेले मजूर देखील शेतकऱ्यांना दादागिरी करत आहेत. रिकव्हरीत देखील चोरी सुरू आहे. साखरसम्राट चोर आहेत त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. उत्पादन खर्च 200% च्या वर गेला आहे, मग ऊसाचा दर किती वाठला? टनाला 70 रूपये फक्त, सवालही त्यांनी केला.