शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राउत (Sanjay Raut ) आणि विधान परिषदेचे विऱोधी पक्षनेते आमदार आंबादास दानवे (MLA Ambadas Danve) यांनी राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे (Journalist Shashikant Warishe) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. पत्रकार शशिकांत वारिशे यांची राजकिय हत्याच झाली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
हेही वाचा >>>> ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
पत्रकार वारिशे यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर खासदार संजय राउत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना ते म्हणाले, “शशिकांत वारिशे यांची हत्या ही राजकिय ह्त्याच आहे. राज्यात असंवैधानिक सरकार आल्यावर आता या प्रकल्पाला कोण रोखतयं ते पाहू ? अशा गर्जना झाल्या. शशिकांत वारिशे यांची हत्या ही याचाच एक भाग आहे. तुम्ही असे किती खून करणार आहात ? आणि किती खून पचवणार आहात ?”असा सवाल त्यांनी केला.
7 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ‘महानगरी टाईम्स’ (mahanagri Times) या वर्तमानपत्राचे रिफायनरीसंदर्भातील बातम्या देणारे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. राजापूरात पेट्रोल पंपावर ‘थार’ गाडीनं त्यांच्या दुचाकी वाहनला जोरात धडक दिल्य़ानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघाती मृत्यू नसून घातपात असल्याचा आरोप पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. तसंच याचा संबंध आहे असा दावा वारिसे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.