ठाकरे- शिंदे वादामधील आमदारांच्या अपात्रतेसंबंधी सुनावणी 7 सदस्यीय खंडपीठाकडे देण्यात यावी या ठाकरे गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांना मिळणाऱ्या अधिकारांसंबंधीत नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी हे खंडपीठ गठीत करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जावं अशी त्यांची ईच्छा असल्याचे म्हटले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालय आज यावर निर्णय देईल असे अपेक्षित होते. पण यावर निर्णय देण सोप नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. जरी आज निकाल द्ला नसला तरी न्यायालयाले दोन्ही बाजू ऐकून निर्णय द्यावाच लागेल. या संदर्भात न्यायायलयाने स्पष्ट सांगितले आहे कि, नबाम रेबिया निकाल डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेता येईल असं काही नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असून आमच्यानुसार बंडखोर सर्व आमदार अपात्र आहेत. यावर निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने फक्त शिक्कामोर्तब करण्याचे बाकी आहे. ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे प्रकरण देण्यात यावं म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. एक घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचं हे घटनापीठालाच ठरवावं लागेल.” असंही संजय राऊतांनी नमूद केलं.