ऑनलाईन टीम/तरुण भारत
उद्धव ठाकरे हे पुढची २५ वर्ष मुख्यमंत्री असतील, असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. सोनिया गांधी (Sonia Gandhi), शरद पवार (Sharad Pawar), सुप्रीया सुळे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर खूश आहेत, असंही शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे.” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करीत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सगळेच जण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर खूश आहेत. त्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांवर पलटवार केलाय.
भाजप दोन्ही उमेदवार हे मूळचे पक्षतील नाहीत. जे पक्षतील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना डावललं आहे. परंतु जे इतर पक्षातून आलेले आहेत आणि ते फक्त शिवसेना आणि महाविकास आघाडीवर चिखलफेक करत असतात, अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी आहे, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
भाजप घेडेबाजार करणार
राज्यसभेच्या सहा जागांपैकी सातव्या जागेवर ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना या राज्यामध्ये घोडेबाजार करायचा आहे. भाजपकडे तिसऱ्या जागेसाठी निवडून येतील इतकी मते नाहीत. कारण त्यांच्याकडे मतं जर असली असती तर त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली असती. परंतु आधी संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांना सहाव्या जागेसाठी भाजपाने उभं राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वाऱ्यावर सोडलं. त्यानंतर आता त्यांनी दूध आणि एका साखर सम्राटाला उमेदवारी दिली आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे.