भारत जोडो यात्रेला दिला जाणार पाठींबा; स्वराज्य इंडिया पक्षाच्यावतीने आयोजन
कोल्हापूर प्रतिनिधी
देशातील सर्व जन आंदोलनाच्यावतीने व स्वराज इंडिया पक्षाच्या पुढाकाराने ‘भारत जोडो’ यात्रेला पाठींबा देणारी संविधान बचावो जनसंवाद यात्रा कोल्हापूर मधून निघणार आहे. कोल्हापूर समता भूमी ते नांदेड या मार्गावरून जाणारी ही यात्रा 2 नोव्हेंबर 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरु राहणार आहे. यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापुर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिह्यातून जनसंवाद केला जाणार आहे.
कोल्हापूर मधून सुरु होणाऱया यात्रेच्या उद्घाटनासाठी ‘स्वराज इंडिया’ पक्षाचे संस्थापक ,जेष्ठ विचारवंत ,समीक्षक आणि शेतकरी आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत. 2 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता बिंदू चौक येथे अभिवादन करून पदयात्रेने दसरा चौक येथे येवून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांचा वारसा सांगणाऱया साहित्यिकांची ग्रंथसंपदा योगेंद्र यादव यांना भेट म्हणून दिली जाणार आहे. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, जयंत आसगांवकर, माजी आमदार संपतराव पवार पाटील, श्रीपतराव शिंदे, विजय पोवार हे मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दुपारी इचलकरंजी व सायंकाळी जयसिंगपुर येथे ही पद यात्रा व जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ‘नफरत छोडो संविधान बचाओ’ यात्रेसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे मोठे सहकार्य व सहभाग असल्याचे यात्रा संयोजक स्वराज इंडिया पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ललित बाबर व राष्ट्र सेवादलाचे बाबासाहेब नदाफ यांनी सांगितले.
यात्रेच्या संयोजनामध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, गुलाबराव घोरपडे, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, वसंतराव पाटील, शिवाजीराव परुळेकर, प्राचार्य टी .एस . पाटील, भरत लाटकर, आर. के. पोवार, भरत रसाळे, राजू लाटकर, कॉ. सतीश कांबळे, रवी जाधव, कॉ. अतुल दिघे, कॉ. चंद्रकांत यादव, गौतम कांबळे, गणी आजरेकर, वसंतराव मुळीक, प्रभा यादव, कल्पना मोहिते, शैला कुरणे, भाई दिलीप पवार, वैभव कांबळे, विजय भोगम, सुनील पोवार, शहाजी गोंगाने, गणपती शिंदे आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.