शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी/बेळगाव
सध्या खरीप पेरणी जोरात सुरू असून बियाणे आणि खताचा कृत्रिम तुटवडा करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक दराने बी बियाणे आणि खते खरेदी करावी लागत आहेत. तेव्हा तातडीने बी- बियाणे खरेदी करावी त्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
बाजारपेठेत काळ्या बाजाराने 2500 रुपयेप्रमाणे खताची विक्री केली जात आहे. तर बियाण्याचे दरही 300 रुपये क्विंटल पासून अधिक करण्यात आले आहेत. 800 रुपये दर 3,000 झाला आहे. तरी देखील त्याकडे सरकार आणि जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आम्ही आंदोलन करत असून तातडीने दर कमी करावेत अशी मागणी केली आहे.