अर्थशास्त्र विभागाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन
बेळगाव : य् ाsथील कर्नाटक लिंगायत संस्थेच्या लिंगराज महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्यावतीने केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चासत्र झाले. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश कांबळे, बागलकोट येथील प्रा. आफताबभाई, साहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, शासकीय प्रथमश्रेणी महाविद्यालय, लोकापूर आणि बेंगळूर येथील चंद्रकांत लोकरे, उपायुक्त, वाणिज्य कर विभाग हे उपस्थित होते. व्यासपीठावर लिंगराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनमनी आणि अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ. राघवेंद्र हाजगोळकर यांचा चर्चासत्रात सहभाग होता. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एस. मेलीनमनी होते. यावेळी डॉ. पी. एस. कांबळे म्हणाले, कृषी हा भारतीय समाजाचा कणा आहे. या कल्पनेची जागा आता सेवाक्षेत्राने घेतली आहे. ज्याचे जीडीपीमध्ये 53 टक्के योगदान आहे. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 व अंतर्दृष्टीसह चर्चा केली. त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाची मूलभूत माहिती सादर केली. भारताची सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी आणि सध्याच्या अर्थसंकल्पाशी त्याची तुलनात्मक प्रासंगिकता स्पष्ट केली. अर्थसंकल्पाचे क्षेत्रीय वाटप आणि सध्याची बेरोजगारी, गरिबी आणि शिक्षणावर त्याचे परिणाम आणि वर्तमानकाळातील साक्षरता, बेरोजगारी व दारिद्र्या या स्थितीवरील विश्लेषणात्मक माहिती सादर केली.
य् ाावेळी चंद्रकांत लोकरे यांनी करसंकलनातील प्रगती आणि सरकारी महसुलाचे गैर-करसंकलन आणि अर्थव्यवस्थेच्या विकासावरील अंदाजे खर्च, विविध प्रकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर जसे की संपत्ती कर, वैयक्तिक आयकर, जीएसटी, महसूल संकलनासाठी योगदान देणारे कस्टम ड्यूटी आदी विविध बाबींवर चर्चा केली. य् ाावेळी अर्थशास्त्र विभागातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक तेजस फडके याला रोख रु. 2500, द्वितीय क्रमांक चंद्रलेखा पाटील 1500 रु. आणि तृतीय क्रमांक संगीता ठकई रु. 1000 चे बक्षीस वितरण करण्यात आले. अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय सेमिनार स्पर्धेत रु. 2500 चे पहिले पारितोषिक अमृता जंताली, केएलई एस. जे. जी. कॉलेज ऑफ कॉमर्स हुबळी, रु. 1500 चे दुसरे पारितोषिक जे. एस. एस. कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय गोकाकची विद्यार्थिनी स्वाती निडोनी हिला आणि रु. 1000 चे तिसरे पारितोषिक केएलईचे एसएसएमएस महाविद्यालय, अथणीची विद्यार्थिनी आराधना सोमय्या हिला रोख देण्यात आले. विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख पारितोषिक देण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. नंदन कटांबळे यांनी करून दिला. कुलसुम ढाकणी, श्रुती गौतणकर, तनीषा तिरवीर, तुषार चव्हाण, बसनगौडा पाटील, वैभव अर्जुनवाडकर आणि सई पाटील या विद्यार्थ्यांनी चर्चासत्रात सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. नंदन कटांबळे, डॉ. विश्वनाथ खोत, डॉ. महांतेश सोगल व प्रा. सौम्या हत्ती यांनी परिश्रम घेतले.
अर्थसंकल्प पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या…
प्रा. आफताबभाई यांनी अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण माहिती देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 2030 पर्यंत शून्य दारिद्र्या साध्य करण्याचे लक्ष्य आणि नवीन करप्रणाली, अर्थव्यवस्थेतील बचत दरावर परिणाम यावर त्यांनी मत अधोरेखीत केले. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्प पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा, असा सल्ला त्यांनी दिला.