दोन दिवसांच्या घसरणीला विराम : इंडसइंड बँक, बजाज फायनान्स तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी सेन्सेक्सने मागील दोन दिवसांच्या घसरणीला पूर्णविराम देत तेजी प्राप्त केली असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये किरकोळ महागाईचा दर 11 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच सहा टक्क्यांच्या खाली राहिला असल्याचे दिसून आले. यांचा सकारात्मक परिणाम हा भारतीय शेअरबाजारात मंगळवारी दिसला आणि दोन्ही मुख्य निर्देशांकात मोठी तेजी राहिली होती.
बीएसईमधील 30 समभागांचा सेन्सेक्स दिवसअखेर 402.73 अंकांनी वधाऊन निर्देशांक 62,533.30 वर बंद झाला आहे. यासह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 110.85 अंकांनी वधाऊन 18,608.00 वर बंद झाला आहे. काहीवेळ बाजारात सेन्सेक्स 437.35 अंकांच्या उच्चांकावर राहिल्याची नेंद करण्यात आली होती.
मुख्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, टेक महिंद्रा आणि बजाज फिनसर्व्ह हे लाभासह बंद झाले आहेत. यासह अन्य कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया, टाटा स्टील, माऊती सुझुकी आणि टायटन यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील घडामोडींमध्ये आशियातील बाजारांमध्ये जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसेंग लाभासह बंद झाले. तसेच चीनमधील शांघाय कम्पोझिट व दक्षिण कोरियाचा कॉस्पी घसरणीत राहिला आहे. चालू आठवड्यातील शेअर बाजारातील स्थितीसंदर्भात मागील आठवड्यातच बाजारात दोलायमान स्थिती राहणार असल्याचे संकेत व्यक्त केले होते. साधारणपणे यासंबंधाचे अंदाज नवीन आठवड्यातील कामगिरीत सकारात्मक ठरत असल्याचे दिसून येत आहे. आता आगामी प्रवासामध्ये भारतीय बाजारात कोणती स्थिती प्राप्त करणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेण्याची गरज असल्याचेही म्हटले जात आहे.