नियोजना बरोबर सोमवार पेठ मध्ये सम-विषम पार्किंगची गरज
शिराळा / वार्ताहर
शिराळा शहरातील वाढती वाहतूक आटोक्यात आणण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिराळा शहरातील वाढती वाहतूक सर्वसामान्यांची डोकेदुखी होत आहे. तर सोमवारच्या आठवडी बाजाराचे योग्य नियोजन कराण्याची मागणी सर्वानुमते करण्यात आली. तर सोमवार पेठ मध्ये सम-विषम पार्किंगची व्यवस्था करणे ही गरजेचे आहे.
या नियोजन बैठकीस तहसीलदार गणेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगराध्यक्ष प्रतीभा पवार, पाणी पुरवठा अधिकारी शरद पाटील,आदी प्रमुख उपस्थित होते.
शिराळा शहरातील सोमवार पेठ मध्ये वाहन पार्किंग साठी सम-विषम पार्किंगची व्यवस्था करावी लागणार असून सोमवार पेठ, गुरूवार पेठ तसेच कोकरुड नाका, कापरी नाका, एसटी स्टँड परिसर आदी ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. या भागात होणाऱ्या वाहनांच्या गर्दीमुळे सर्वसामान्य लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवार पेठेमध्ये तर गर्दी कायम असते. त्यामुळे इतर वाहनधारकांना गोपालकृष्णपथकडून फिरुन जावे लागत आहे. परंतु सदर रस्त्यावरील अरुंद वळने व चिंचोळ्या रस्त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.तर एसटी स्टँडवर रस्त्याचे रुंदीकरण झाले असून या रस्त्यावरील अतिक्रमणे काढली आहेत.पुन्हा स्टॅण्ड परिसरात अतिक्रमणे होणार नाही याची नगरपंचायतीने दक्षता घेण्याची मागणी करण्यात आली.
तसेच शहरातील अतिक्रमण काढण्याची गरज असुन व्यापार्यांनी दुकानासमोरील रस्त्यावर बोर्ड लावने, किंवा डेमो ठेवून अतिक्रमण करणे टाळावे. तसेच नगरपंचायतीने नियमावली तयार करावी अशा सूचना तहसीलदार गणेश शिंदे यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत आहेत.
तसेच व्यापारी असोसिएशनने एकत्रित येऊन प्रशासनाला सहकार्य करावे. तर पोष्ट ऑफिस, बॅंका, सोसायट्या आदी विविध अस्थापनांना पार्किंगची स्वतः व्यवस्था करावी अशा सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिराळा पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसाची शहरातील मुख्य बाजारपेठेत करण्याची मागणी मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केली.
सोमवारी भरणार्या आठवडी बाजारामध्ये सोमवार पेठेमध्ये गर्दी अतिशय होत असल्याने चोर्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आठवडी बाजाराचे नियोजन योग्य करण्याची मागणी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी केली आहे.तर सोमवारच्या बाजारातील मधल्या ओळी काढून बाजार सरळ तळीच्या कोपऱ्यात पर्यंत भरवल्यास सोमवार आठवडी बाजाराचे नियोजन योग्य होईल असे नगराध्यक्ष प्रतीभा पवार यांनी सांगितले.
यावेळी विश्वासचे संचालक विश्वास कदम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, सभापती मोहन जिरंगे, माजी उपनगराध्यक्ष किर्ती कुमार पाटील, संजय हिरवडेकर, काजोल शिंदे, प्रीती पाटील,अर्चना गायकवाड, संजय इंगवले, निसार मुल्ला, सराफ संघटनेचे अध्यक्ष सचिन शेटे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल पारेख, अविनाश चितुरकर, लक्ष्मण मलमे नगरसेविका सीमा कदम,माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के, सुनिता निकम, सुभाष इंगवले आदींसह व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.