वार्ताहर /मडकई
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य हे आदर्श राज्य आहे. विद्यामान स्थीतीत अशा सुराज्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येकाने तसे प्रयत्न केल्यास सरकारने सुरू केलेला शिव राज्याभिषेक सोहळा खऱया अर्थाने सार्थकी लागेल, असे उद्गार वीजमंत्री सुदिन ढवळीकर काढले.
फुर्मागुडी किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महारांजाच्या अश्वारूढ पुतळय़ाला मंत्री ढवळीकर यांनी पुष्पहार अर्पण करुन शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी फोंडय़ाचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, दामोदर नाईक, बांदोडा पंचायतीचे सरपंच राजेश नाईक, उपसरपंच सलोनी गावडे, पंचसदस्य वामन नाईक, कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, मडकईच्या सरपंच लक्ष्मी तारी, उपसरपंच विशांत नाईक, पंचसदस्य राजू नाईक, दुर्भाट आडपईच्या सरपंच सरोज नाईक, फोंडय़ाच्या नगरसेविका गिताली तळावलीकर तसेच मडकई मतदार संघातील विविध पंचायतींचे पंचसदस्य व शिवप्रेमी उपस्थित होते. पंचायतीच्या सरपंच व पंचसदस्य व नागरिक उपस्थीत होते. स्वागत सलोनी गावडे यांनी तर राजेश नाईक यांनी आभार मानले.