ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप (BJP) आणि शिवसेनेने २०१९ ची विधानसभा निवडणूक एकत्रित लढवली. पण शिवसेनेने युती मात्र राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसशी (congress) केली. यांनतर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेमधील दुरावा वाढला आहे. दरम्यान, भविष्यात भाजप-शिवसेना एकत्रित असतील का असा प्रश्न चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांना पत्रकारांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत विचारला असता त्यांनी आमच्या पार्टीमध्ये एक माणूस असा निर्णय घेऊ शकत नाही. जो काही निर्णय असेल तो राष्ट्रीय कार्यकारणी घेईल असे ते म्हणले. तसेच मुख्यमंत्रीपदाचे फेविकॉल घट्ट असल्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, भविष्यात भाजप हा शिवसेना व मनसेसोबत एकत्र असेल का या प्रशांवर चंद्रकांत पाटील म्हणाले, आमच्या पार्टीमध्ये एक माणूस असा निर्णय घेऊ शकत नाही. पहिल्यांदा 13 जणांच्या राज्य कार्यकारणी समोर प्रस्ताव सादर केला जातो. त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी काय तो निर्णय घेत असते. आमच्या पक्षात एक व्यक्ती तसेच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये हा निर्णय घेतला जात नाही. असा खोचक टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला. शिवाय मुख्यमंत्रीपदाचे फेविकॉल घट्ट असल्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल असं वाटत नाही असा चिमटाही त्यांनी काढला.