वार्ताहर राजापूर
बारसू येथील पस्तावित रिफायनरी पकल्पावरून आंदोलन सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे शनिवार दि.6 मे रोजी राजापूर दौऱयावर येत असून ते बारसुला भेट देणार आहेत. पक्षप्रमुखांचा बारसू दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्याकडून जय्यत तयारी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
दरम्यान जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने उद्धव ठाकरे यांना बारसू येथे सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिफायनरी पकल्पाकरीता बारसू परिसरात सुरू असलेल्या माती परीक्षाच्या विरोधात मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शिवसेनेनेही उडी घेतली असून स्वत शिवसेना पक्षपमुख उध्दव ठाकरे हे शनिवारी बारसू येथील आंदोलकांना भेटण्यासाठी येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उध्दव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर कोंबे येथे उतरणार असून तेथे हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. तेथून ते राजापूर मार्गे बारसू येथे जाणार असून या परीसरातील कातळशिल्पांची पहाणी करणार आहेत. त्यानंतर प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पक्षपमुखांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱयांकडुन शुक्रवारी कोंबे येथील हŸलीपॅडची पहाणी करण्यात आली. या दाऱयात राज्य विधान परीषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित रहाणार आहेत.
..त्या पत्राबाबत ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष
दरम्यान नाणार येथे रिफायनरीचा प्रकल्प रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथील जागा सुचविली होती. त्यानंतर आता ठाकरे यांनी पकल्पाच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्यावर जोरदार टिका केली जात होती. उध्दव ठाकरेंच्या या दौऱयामुळे पुन्हा त्या पत्राचा मुद्दा ऐरणीवर आला असून त्याबाबत श्री.ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली…
दरम्यान बारसू येथे सभा घेण्यासाठी ठाकरे शिवसेनेकडून जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने या आधीच जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे ठाकरे यांना बारसू येथे सभा घेण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे बारसू येथे दाखल झाल्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधणार असून नंतर ते पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.