बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवानेते शुभम शेळके यांनी गडहिंग्लज येथे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची भेट घेतली. शिवसेना कायम सीमावासियांच्या पाठीशी खंबीर आहेच. पण कर्नाटक सरकार सातत्याने आमची भाषा, संस्कृती संपविण्यासाठी रोज नवीन फतवे काढत आहे आणि महाराष्ट्र शासन काहीच करत नाही. यावर उद्धव साहेबांशी चर्चा करून आवाज उठवावा, अशी विनंती केली. यावेळी बोलताना सीमाप्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहेच. उद्धव साहेबांशी चर्चा करून नक्कीच यावर आवाज उठवू, अशी ग्वाही वरुण सरदेसाई यांनी यावेळी दिली. याप्रसंगी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, सूरज कणबरकर, रवी निर्मळकर, विनायक हुलजी, सचिन दळवी, डॉ. सतीश नरसिंग, युवासेना तालुकाप्रमुख विक्रम मुतकेकर आदी उपस्थित होते.
Previous Articleमारुतीनगर येथील समस्या तातडीने सोडवा
Next Article अमटूर पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.