पुणे/ प्रतिनिधी :
राज्याच्या अनेक भागात शुक्रवारी थंडीत किंचित घट नोंदविण्यात आली. राज्यात पुण्यात सर्वात कमी 9.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका जाणवत आहे. जळगावात हंगामातील सर्वात कमी 5 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. गुरुवारपर्यंत थंडीची तीव्रता जास्त होती. शुक्रवारी मात्र यात किंचित घट झाली. किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने काही भागात वाढले आहे. यामुळे बोचरी थंडी थोडीशी कमी जाणवत आहे.
विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम आहे, तर कोकण गोव्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.