कोल्हापूर प्रतिनीधी
शासन आपल्या दारी.. जनसामान्यांच्या विकासासाठी …हे अभियान 15 एप्रिल ते 15 जून 2023 दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जनसामान्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये पोहोचवण्यासाठी व पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये या करिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग प्रयत्नशील असेल अशी माहिती विशाल लोंढे, सहायक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांनी दिली.
शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आज पन्हाळा तालुक्यातील शहापूर या गावी सामाजिक न्याय विशेष आहे विभागाच्या योजनांची माहिती प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विविध योजनांचे अर्ज देण्यात आले. अर्ज भरून घेऊन ते परिपूर्ण करण्यासाठी शहापूर ग्रामपंचायत सर्वसामान्यांच्या सोबत असून सर्वोत्तपरी सहकार्य करेल असे आश्वत नागोजी यशवंत चौगुले, लोकनियुक्त सरपंच शहापूर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 46 नुसार राज्यातील वंचित दुर्बल घटक तसेच अनुसूचित जाती -जमाती इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करणे व त्यांच्या हक्काचे आधिकार्याचे संरक्षण व संवर्धन करणे अंतर्भूत असून त्या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कार्यरत असून या विभागाच्या वतीने सामाजिक ,आर्थिक शैक्षणिक योजना राबवून वंचित दुर्बल तसेच मागासवर्गीय लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी व त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सामाजिक न्याय व इतर बहुजन कल्याण विभाग कार्यरत आहे असे मत व्यक्त करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ,आंतरजातीय विवाह कन्यादान योजना, गुणवत्ता पुरस्कार व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी यांच्या वतीने देखील राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे तालुका समन्वयक सचिन कांबळे यांनी दिली.
त्यानंतर प्रदीप जाधव, कनिष्ठ लिपिक, सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी रमाई आवास योजना, यशवंत यशवंतराव चव्हाण मुक्त व वैयक्तिक घरकुल योजना ,धनगर बांधवांसाठी घरकुल योजना या योजनांची माहिती दिली.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मुलांसाठी शासकीय निवासी शाळा चार ठिकाणी कार्यरत असून या ठिकाणी मुलांना मोफत शिक्षण, राहणे ,खाणे व इतर सोयी सुविधा पुरवल्या जातात .तसेच भारत सरकार शिष्यवृत्ती योजना व शासकीय वस्तीग्रह मध्ये पात्र मुलांना प्रवेश न मिळाल्यास त्यांच्याकरिता निवास ,भोजन निर्वाह ,शैक्षणिक साहित्या करिता सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 45 हजार रुपये पर्यंत लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो अशी माहिती संजय भोसले, मुख्याध्यापक निवासी शाळा मसूद माले यांनी दिली.
विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व इतर बहुजन मुलांसाठी शासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23 आश्रम शाळा कार्यरत असून इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत चे संपूर्ण मोफत शिक्षण राहणे व इतर शैक्षणिक साहित्य आश्रम शाळेच्या माध्यमातून पुरवले जातात सदर आश्रमशाळेतरीता पात्र विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक कालावधी करता अर्ज सादर करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा असे मत शशिकांत म्हेतर मुख्याध्यापक, कुशिरे प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा यांनी केले.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत शहापूर पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी वर्ग गावातील नागरिक तरुण वर्ग यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाकरिता सरपंच नागोजी यशवंत चौगुले.उपसरपंच राहूल हंबीरराव पाटील,ग्रामसेवक सुहासिनी रामचंद्र गुरव. सदस्य दीपक बाबुराव समुद्रे ,सविता श्रीकांत समुद्र व गावचे पोलीस पाटिल व इतर मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभरंगे सर यांनी केले तर आभार सामुद्रे सर यांनी मांडले.