त्या दिवशी खूप दिवसांनी मैत्रिणी भेटलो होतो. उषा मात्र प्रचंड अस्वस्थ होती. सगळय़ा मैत्रिणींच्या घोळक्मयात शरीराने होती खरी परंतु चेहऱयावरचे रंग पार उडून गेले होते. दिवसभर खरंतर मैत्रिणींच्या गप्पाटप्पा रंगात आल्या होत्या पण उषा मात्र वेगळय़ाच विश्वात हरवून गेली होती. शेवटी मी तिला विचारलं, ‘काय गं. सकाळपासून मी पाहते आहे. सगळय़ा छान एकत्र जमलोय. मज्जा करतोय, पण तुझा चेहरा असा का? काही बिनसलंय का?’
‘विशेष काही नाही गं. इथे ट्रिपला येण्यावरूनच थोडं बिनसलं.’
‘म्हणजे?’
‘आज मी कित्ती दिवसांनी बाहेर पडलेय. सकाळी चहा घेताना नवरा पटकन् म्हणाला, आज काय मॅडमची मज्जा आहे. दिवसभर धम्माल करणार. आम्हाला कोण विचारतो बा आज. मैत्रिणी भेटणार ना. वगैरे.. मला आला राग. मी चिडून म्हटलं तू जातोस तेव्हा आम्ही काही बोलतो का? त्यावर तो म्हणाला, थट्टा कळते की नाही तुला. मी गंमत करत होतो. मला ते नाही पटलं आणि थोडा वाद झाला. तो मात्र, तुझी मस्करी करण्यातही अर्थ नाही म्हणून निघून गेला. मी इथे आलेय खरी, पण अजूनही मनात झगडा सुरूच आहे.’
आता पहा हं. उषाचा नवरा थट्टेनं तिला काही म्हणाला. त्याच्या दृष्टीने तो विषय तिथेच संपला. पण उषाचे स्वगत मात्र सुरुच राहिले. घटना घडून गेली परंतु तिचे स्वगत तिला दिवसभर अस्वस्थ करत राहिले आणि ट्रिपला येऊनही ती त्या ट्रिपचा आनंद लुटू शकली नाही.
उषाचे स्वगत. तो असं बोललाच का? कशासाठी? काय गरज होती का त्याला मस्करी करायची? त्याने नक्की मस्करी केली असेल का? की मुद्दाम? माझं जाणंच नको असेल त्याला बाहेर? आम्ही कधी अडवतो का त्याला? सगळय़ा जबाबदाऱया पार पाडते पण स्वतःहून कुणी जा हिंडून ये म्हणत नाही. आज निघाले तर हे असं. आम्ही बाहेर पडायचंच नाही का? कितीही केलं तरी कमीच यांना. वगैरे वगैरे. चिडचिड सुरू.
उषाचे स्वगत तिला अस्वस्थता देण्याचे काम करत असे. तिचा हा सारा किस्सा ऐकल्यानंतर आम्ही कॉलेजला एकत्र असतानाचा तिचाच एक किस्सा मला आठवला. उषा बाजारातून जात असताना तिची बालमैत्रिण मीनू तिला काही खरेदी करताना दिसली. मीनू काहीतरी घेण्यात गर्क होती. तिने उषाला पाहिलेही नव्हते. वास्तविक उषाला जर तिच्याजवळ बोलायचे होते तर तिला मीनूला हाक मारणे सहज शक्मय होते. पण उषाने गैरसमज करून घेतला की मीनूने मुद्दामच न पाहिल्यासारखे केले. तेव्हा हाक मारली नाहीच आणि नंतर दोन तीन दिवस तिच्याशी अबोला धरला.
त्यावेळी घडलेल्या घटनेनंतर उषाचे स्वगत कसे होते पहा हं. ‘कसली मीनू, नावाला बालमैत्रिण. पाहून न पाहिल्यासारखं केलं. किती मिजास ही. जरा शिकली काय, लगेच मोठ्ठी झाली होय? मला तरी काय गरज हिला हाक मारायची? एवढी कोण टेकोजीराव ही. हं..नाहीतर नाही. मला काही मैत्रिणींची कमी नाही.’ ही अशी तणतण दिवसभर उषाच्या मनात सुरूच राहिली. तब्बल तीन दिवस तिची ही अस्वस्थता टिकून राहिली. मैत्रिणींसोबत झालेल्या चर्चेतून नंतर ती शांत झाली आणि आपल्या त्या घटनेकडे पहायच्या दृष्टिकोनाने किती गल्लत केली हे तिला त्यावेळी कळून चुकले. परंतु आजही तिची ती सवय तशीच कायम होती.
एखाद्या गोष्टीचा भावनिक परिणाम ती गोष्ट घडून गेल्याबरोबर दिसत नाही, तर घटनेच्या संदर्भात आपण जे स्वगत बोलतो त्याच्या आधारे आपल्या मनात भावना निर्माण होत असतात. हे स्वगत इतके झटकन् व सहजतेने बोलले जाते की आपल्याला त्याची जाणीवही होत नाही, परंतु माणसाची अस्वस्थता टिकवून ठेवण्याचे काम ते करत असते. मनात येणाऱया विविध विघातक भावना याच स्वगतामुळे निर्माण होत असतात. जोपर्यंत हे स्वगत घोळत राहील तोपर्यंत त्या भावना आनंदापासून आपल्याला वंचित करतील. जे आपण उषाच्या उदाहरणात पाहिले. अशा पद्धतीचे स्वगत जर सतत होऊ लागले आणि विघातक भावना सातत्याने निर्माण होऊ लागल्या तर त्या आपल्याला निष्क्रिय बनवतील व कालांतराने मनोविकाराकडे नेतील हे लक्षात घ्यायला हवे. विशेष म्हणजे एखाद्या समस्येचे मूळ जरी भूतकाळात असले तरी ती समस्या, परिस्थिती टिकून राहते ती व्यक्तीच्या अविवेकी स्वगतामुळे!
स्वगताचे तर्कशुद्ध विश्लेषण सहसा कुणी करत नाही. त्यामुळे आपल्याला वाटते ते आणि तेवढेच खरे असा गैरसमज व्यक्तीमध्ये निर्माण होतो. मला नेहमीच यश मिळायला हवे, अपयश येता कामा नये, मला सर्वांनी चांगलेच म्हटले पाहिजे, माझे आयुष्य सुखातच जायला हवे, दुःख-गैरसोय माझ्या वाटय़ाला यायला नको.
या तीन समजुती वा अवाजवी कल्पना माणसाच्या दुःखास कारणीभूत ठरतात. यश, प्रशंसा, सुख या संदर्भातील अट्टहास थोडा जरी दूर सारला तरी बऱयाच गोष्टी सोप्या होतात.
आपले सुख समाधान आपल्या हातात असते. जोपर्यंत व्यक्ती चुकीचे विचार सोडून तर्कसंगत आणि स्वतःच्या विकासाला पोषक असे विचार आत्मसात करत नाही तोपर्यंत समस्येपासून तिची सुटका होत नाही. आपली विचारसरणी प्रयत्नपूर्वक बदलायला हवी. अर्थात त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतीलच.
आपण सगळय़ांनी एक प्रयोग करायला हरकत नाही. जर तुम्ही त्रासदायक विचारांनी त्रस्त असाल तर
s एका कागदावर ते विचार आणि त्या अनुषंगाने होणारे स्वगत याची नोंद करा.
s नोंद केलेले स्वगत तपासा, त्याच्या मुळाशी दडलेल्या अविवेकी धारणांचा शोध घ्या.
s अशा धारणा मनातून काढून टाका. वास्तववादी, विवेकपूर्ण विचार जाणीवपूर्वक आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
कोणत्याही घटनेसंदर्भात मनात निर्माण होणारे स्वगत तपासून पहायची सवय लावून घ्यायला हवी. स्वगताकडे लक्ष असेल तर बऱयाच गोष्टी सोप्या होतील. चला तर मग आजपासून आपल्या स्वगताकडे अर्थात ‘सेल्फटॉक’ कडे लक्ष देणार ना?
नक्कीच द्या. जीवनाची वाटचाल सोपी करायला ते नक्कीच मदत करेल यात शंका नाही!
-ऍड. सुमेधा संजीव देसाई