विविध गावांमध्ये रोपलागवडीचे उद्दिष्ट, विविध जातींची रोपलागवड
प्रतिनिधी /बेळगाव
पर्यावरण संवर्धन आणि संतुलनासाठी दरवषी सामाजिक वनीकरण विभागामार्फत हजारो रोपांची लागवड केली जाते. यंदादेखील विभागामार्फत ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये रोपलागवडीला प्रारंभ झाला आहे. राकसकोप, बिजगर्णी, उचगाव, बेळगुंदी, अगसगा, चलवेनहट्टी आदी गावातील रस्ते, सरकारी जागा, खुली जागा आणि इतर ठिकाणी वृक्षलागवड केली जात आहे.
वृक्षांची संख्या वाढविण्यासाठी विभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. दरवषी हजारो वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन केले जाते. तसेच पावसाळय़ाच्या तोंडावर वृक्षलागवडीचे काम हाती घेतले जाते. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा, ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी आणि इतर ठिकाणी विविध जातींची रोपे लावली जातात. यामध्ये आंबा, फणस, कडीपत्ता, चिकू, जांभूळ आदी रोपांचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेलादेखील विविध फळांची चव चाखता येणार आहे.
सामाजिक वनिकरण विभागामार्फत गतवषी ग्रामीण भागातील विविध गावात 30 हजारहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली होती. यंदादेखील 30 हजारहून अधिक रोपलागवड करण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. दमदार पावसानंतर रोपलागवडीला वेग येणार आहे.
झाडाचे संवर्धन करणे प्रत्येकाचे कर्तव्य
ग्रामीण भागातील विविध परिसरामध्ये रोपलागवडीला प्रारंभ करण्यात आला आहे. रोपलागवडीबरोबर झाडांच्या सभोवती कुंपणदेखील घातले जात आहे. लावलेल्या रोपांच्या संवर्धनासाठी नागरिकांचे सहकार्यदेखील गरजेचे आहे. झाडे आपला श्वास असल्याने त्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
– प्रशांत जैन, सामाजिक वनीकरण विभाग अधिकारी