प्रवासी हैराण, वाहतुकीला अडथळा, बंदोबस्ताची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात भटक्मया कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने हा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील सर्वच भागात भटक्मया कुत्र्यांचे कळप दिसून येत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने प्रवाशांना व बसेसना अडथळा निर्माण होत आहे. प्रवाशांना भीतीच्या छायेखालीच ये-जा करावी लागत आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
अलीकडे नागरी वस्तीबरोबरच बसस्थानक आणि इतर मोकळ्या ठिकाणी कुत्र्यांचा वावर वाढला आहे. दरम्यान मनपाने कुत्र्यांसाठी राबविलेली नसबंदी मोहीमदेखील रखडली आहे. त्यामुळे वाढत्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. मनपाने निरंतर कुत्री पकड मोहीम राबवून नसबंदी करावी, अशी मागणी होत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने प्रवाशांना ये-जा करण्यात अडचणी वाढल्या आहेत. बसस्थानकाजवळ फेरीवाले तसेच इतर व्यावसायिक टाकाऊ पदार्थ रस्त्याशेजारी टाकत असल्याने त्यावर ताव मारण्यासाठी भटकी कुत्री तुटून पडत आहेत. कुत्र्यांचे कळप आसनाशेजारीच ठाण मांडून बसत असल्याने प्रवाशांना आसनाजवळ जाणेदेखील धोक्मयाचे बनत आहे. बसस्थानकात रात्रीच्यावेळी प्रवाशांना फिरणे कठीण झाले असून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. आवारात सर्वत्र कुत्र्यांचे कळप फिरत असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. भटकी कुत्री बसच्या समोर किंवा खाली आसरा घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. परिणामी बसचालक व बसवाहक हैराण झाले आहेत.