बेंगळूर : लोकाभिमुख, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिल्याने देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची जनतेची इच्छा प्रबळ असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार बी. वाय. विजयेंद्र यांनी व्यक्त केले. शिमोगा जिल्ह्यातील शिराळकोप्प येथे रविवारी भव्य रोड शोमध्ये सहभागी झाल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाची आज या देशासह राज्यातील घराघरात चर्चा होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, बी. वाय. राघवेंद्र यांनी 15 वर्षात सक्रिय खासदार म्हणून सर्वाधिक विकासकामे केली आहेत. शिमोगा जिल्ह्यातील विरोधी पक्षही त्यांच्या विकासकामांचे कौतुक करत आहेत. काँग्रेस पक्षाचा उमेदवार पाच वर्षांतून एकदा जाहीर केला जातो. 5 वर्षातून एकदा ते निवडणुकीसाठी हजर असतात. निवडणुकीनंतर ते गायब होतात. तुमचे राघवेंद्र मतदारसंघाच्या विजयासाठी कायम कटिबद्ध आहेत. कार्यकर्त्यांवर सदैव प्रेम आणि विश्वास ठेवला आहे. शेजारील जिल्ह्यातही त्यांच्या विकासकामांचे लोकांनी कौतुक केले आहे. त्यामुळे पुन्हा भाजपला मतदान करून राघवेंद्र यांना विजयी करावे, असे आवाहनही बी. वाय. विजयेंद्र यांनी केले.
Previous Articleकायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही : येडियुराप्पा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.