नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन, दवंडी पिटण्याचे उपक्रमही सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील वेगवेगळय़ा गावात मुलांचे अपहरण करणाऱया टोळीचा वावर असल्याची अफवा वाढत चालली आहे. फिरते विपेते, साधूसंत आदींना हटकण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे पोलिसांनी संपूर्ण जिल्हय़ात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी आदी वरि÷ अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हय़ातील बहुतेक तालुक्मयात बिटनिहाय जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. ध्वनीक्षेपकावरून नागरिकांना सतर्क करणे, दवंडी पिटण्याचे उपक्रमही पोलिसांनी सुरू केले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
बिट पोलीस व अधिकारी यासाठी गावोगावी भेट देत आहेत. शेतवाडीतील घरे, वेगवेगळय़ा गावातील मंदिरे, गावातील पारावर बसलेल्या ग्रामस्थांना गाठून मुलांचे अपहरण करणाऱया टोळीविषयी समाजमाध्यमावर अफवा पसरविण्यात येत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले आहे.
जर संशयास्पद व्यक्ती आढळून आल्यास नागरिकांनी कायदा हातात न घेता जवळचे पोलीस ठाणे किंवा 112 क्रमांकावर माहिती द्यावी, पोलीस स्वतः येऊन त्यांची चौकशी करतील. शहानिशा करून निर्णय घेतील. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. खासकरून अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. जिल्हा पोलीसप्रमुखांनी बुधवारी एक व्हिडीओ संदेशही जारी केला आहे.