आर्थिक वर्ष 2021-22 मधील आकडेवारीचा समावेश : वाणिज्य मंत्रालयाकडून माहिती सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची साखर निर्यात ही आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये वाढून जवळपास 35,000 कोटी रुपयावर पोहोचली आहे. जी वर्ष 2013-14 मध्ये साधारणपणे 9000 कोटी रुपये असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे.
मोठय़ा प्रमाणात मालाची उलाढाल झाली आणि कंटेनर कमी राहिल्याने कोविड महामारीच्या दरम्यान उत्पन्नात समस्या असूनही ही वृद्धी प्राप्त केली आहे. वर्ष 2020-21 च्या दरम्यान 2.79 अब्ज डॉलर्सची साखर निर्यात केली होती.
साखर उत्पादनांमधील राज्यांची हिस्सेदारी
देशातील उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचा देशाच्या एकूण उत्पादनात 80 टक्के हिस्सा राहिला आहे.
121 देशांना साखर निर्यात
भारत हा जगातील प्रमुख साखर निर्यात करणाऱया देशांपैकी एक आहे. ब्राझील नंतर भारत जगातील दुसरा साखर उत्पादक देश आहे. यामध्ये जवळपास जगातील 121 देशांना भारत साखर निर्यात करतो. प्रमुख देशांत इंडोनेशिया, बांग्लादेश, सुदान आणि संयुक्त अरब अमीरात आदींचा समावेश आहे.