वृत्तसंस्था/ कोलकाता
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सने आपल्या ताफ्यामध्ये 160 नव्या सेवा केंद्रांची भर घातली आहे. कंपनीकडे आता एकूण सेवा केंद्रांची संख्या 705 झाली आहे. कंपनीने आपल्या सेवा केंद्राचा विस्तार 485 शहरांपर्यंत केला असल्याचेही टाटाने म्हटले आहे. केंद्रांची संख्या आर्थिक वर्ष 2022 पर्यंत 30 टक्क्यांपर्यंत वाढवली गेली आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये प्रवासी वाहनांकरीताच्या सेवा केंद्रांची संख्या 160 पर्यंत वाढवली आहे. 1 एप्रिल 2022पर्यंत एकूण सेवा केंद्राची संख्या आता 705 झाली आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा केंद्रांचा लाभ व्हावा यासाठी गेल्या बारा महिन्यांमध्ये संख्या वाढवण्यात आली असल्याची माहिती टाटा मोटर्सकडून देण्यात आली आहे.
टाटा मोटर्सनेही वाढवल्या वाहनांच्या किमती
वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सनेही आपल्या वाहनांच्या किंमती 1.1 टक्के इतक्या सरासरी वाढवल्या आहेत. प्रवासी वाहनांच्या किंमती तात्काळ वाढीव दराने लागू होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वाहन निर्मिती खर्चात झालेल्या वाढीमुळे कंपनीला सदरच्या किंमती या वाढवाव्या लागल्या असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. विविध मॉडेलनुसार किंमती या सरासरी 1.1 टक्के इतक्या वाढवल्या जात आहेत. गेल्या काही कालावधीत महिंद्रानेही आपल्या कार्सच्या किमती वाढवल्या आहेत. अनेक कंपन्यांनी वाहनांच्या किंमती 5 ते 8 टक्के इतक्या वाढवल्या आहेत. महिंद्राने 2.5 टक्के इतक्या कारच्या किंमती वाढवल्या आहेत. मारुती सुझुकीनेही वाहनांच्या किंमती वाढवल्या आहेत.