लिथियमचा उपयोग
जम्मू-काश्मीरपाठोपाठ राजस्थानमध्येही पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौल्यवान लिथियम धातूचे भांडार आढळणे, हा भारतासाठी नक्कीच सुवर्णयोग म्हणायला हवा. यामुळे इलेक्ट्रॉनिक आणि वाहन उद्योगांना बूस्ट मिळणार असून, अन्य देशांची मक्तेदारी मोडून काढण्यासही यातून मदत मिळणार आहे. जागतिक तापमानवाढ रोखायची असल्यास प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ ऊर्जा निर्माण करणे आवश्यक आहे. अशा ऊर्जेच्या निर्मितीसाठी लिथियम हा धातू महत्वपूर्ण आहे. त्यामुळे याचे साठे देशात असणे, हे अत्यंत निर्णायक ठरणार असून पुढच्या काळातील जागतिक आर्थिक समीकरणे अशा धातूंच्या उपलब्धतेवर निर्धारीत होणार आहेत, असे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
लिथियम हा दुर्मीळ धातूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. इलेक्ट्रिक उपकरणांना लिथियमशिवाय पर्याय नाही. विद्युत वाहने, मोबाईल बॅटरी यांच्याकरिता हा धातू अत्यावश्यक असतो. याखेरीज इतर इलेक्ट्रॉनिक साधनांच्या निर्मितीतही त्याची गरज भासते. त्यामुळे पांढरे सोने वा ‘व्हाईट गोल्ड’ असाही त्याचा उल्लेख करण्यात येतो. तो सार्थच होय. मागच्या फेब्रुवारीत जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात लिथियमचा 5.9 मिलियन टन इतका साठा आढळला होता. देशात सापडलेला हा तसा पहिलाच साठा. त्यानंतर राजस्थानमध्येही अशाच प्रकारचा ही आनंददायी बाब ठरावी. राज्यातील नागौर जिल्ह्यात साडपलेला हा साठा नेमका किती आहे, यावर अद्याप प्रकाश पडलेला नाही. किंबहुना, राजस्थान सरकार आणि भूगर्भशास्त्र विभागाच्या सर्वेक्षणातील हा साठा जम्मू काश्मीरमध्ये मिळालेल्या साठ्यापेक्षाही अधिक असल्याचा अंदाज आहे. देशाची तब्बल 80 टक्के गरज यातून पूर्ण होईल, असे सांगितले जाते.
चीनवरील अवलंबित्व कमी होणार
भारत हा लिथियमच्या बाबतीत प्रामुख्याने चीनवर अवलंबून आहे. चीनमधून आपल्याकडे लिथियम आयात करण्यात येते. 2020 ते 2021 या काळात सहा हजार कोटी ऊपयांच्या लिथियमची देशात आयात करण्यात आली होती. त्यातील 3,500 कोटी ऊपयांचे लिथियम हे चीनमधून आयात करण्यात आले होते. तथापि, चीनवरील वाढते अवलंबित्व कमी करण्यास हा साठा उपयुक्त ठरू शकतो.
उत्तम दर्जा, अधिक क्षमता
इतर देशात व भारतात साडपलेल्या लिथियमच्या क्षमतेत फरक आढळून आले आहेत. जगभरात सापडलेल्या लिथियमची क्षमता 220 पीपीएम एवढी आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथियमची क्षमता 500 पीपीएम एवढी असल्याचे आढळून आले आहे. साहजिकच त्यापासून बनविलेल्या बॅटरीची क्षमताही दुप्पट राहू शकते.
रफ अँड टफ…
बाजारात लिथियम आयर्न, निकेल मेटल हायड्राइट, लेड अॅसिड, सॉलिड स्टेट, अल्ट्रापॅपेसिटर आदी प्रकारच्या रिचार्जेबल बॅटऱ्या मिळतात. यातील लिथियम बॅटऱ्या या उच्च प्रतीच्या व दर्जेदार मानल्या जातात. ऊर्जा साठविण्याची क्षमता अधिक क्षमता, हा त्यांचा विशेष होय. मुख्य म्हणजे उच्च तापमानातही त्या उत्तम प्रकारे काम करू शकतात. या काळात कोणत्याही समस्या वा अडचणी या बॅटऱ्यांमध्ये निर्माण होताना दिसत नाहीत.
मर्यादित उत्पादनखर्चामुळे परवडेबल…
या बॅटरींच्या उत्पादनावर येणारा खर्च हा वाजवी स्वऊपाचा आहे. खर्च मर्यादित असल्याने या बॅटरी परवडतात. दीर्घायुष्य आणि कमी खर्चामुळे स्वाभाविकच लिथियमच्या बॅटरीस अधिक पसंती दिले जाते. आता भारताला मागच्या चार महिन्यांमध्ये दोन मोठे साठे सापडल्याने उत्पादनावरील खर्च आणखी कमी होऊ शकेल. उत्पादनावरील खर्च कमी झाल्यामुळे स्वाभाविकच इलेक्ट्रिक वस्तूंच्या दरावरही त्यांचे परिणाम संभवतात.
भारतही जगाच्या पंक्तीत
लिथियमच्या उपयुक्ततेमुळे सबंध जगाचे सध्या या धातूकडे लक्ष आहे. आजमितीला बोलविया, अर्जेंटिना व अमेरिका या देशांमध्ये याचे सर्वाधिक साठे आहेत. बोलवियात 21, अर्जेंटिनात 20, तर अमेरिकेत 12 दशलक्ष टन इतके याचे साठे दिसतात. याशिवाय चिलीमध्ये 11, ऑस्ट्रेलियात 7.9, चीन 6.8, जर्मनी 3.2, कांगो 3, पॅनडा 2.9, मेक्सिको 1.7 दशलक्ष इतके साठे आहेत. स्वाभाविकच भारतही या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
नवा पुरवठादार होण्याची सुवर्णसंधी
इंधनाची वाढती गरज व प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वच देशांनी आता इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला आहे. भारतातही अलीकडच्या काळात ई-वाहनांना प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पुढच्या चार वर्षांत जगभरात तीन हजार गिगा वॅट प्रतितास इतकी बॅटरी क्षमतेची गरज असेल. नव्या साठ्यांमुळे जगाच्या बाजारपेठेत महत्त्वाचा पुरवठादार देश म्हणून पुढे येण्याची भारताला सुवर्णसंधी असेल. आजमितीला 1 टन लिथियमची किंमत 57.36 लाख ऊपये इतकी असल्याने ज्या देशाकडे लिथियमचा साठा अधिक, त्याला भविष्यात मोठे महत्त्व असेल. हे पाहता भारतासाठी ती जमेची बाजू ठरावी.
स्वच्छ ऊर्जेचा खात्रीशीर पर्याय
जागतिक तापमानवाढ किंवा ग्लोबल वार्मिंग हा आज कळीचा मुद्दा बनला आहे. ढगफुटी, अतिवृष्टी, हिमनद्यांचे वितळणे, समुद्रपातळीतील वाढ, थंडी वा उष्णतेच्या लाटा हे सारे ग्लोबल वार्मिंगचे परिणाम मानले जातात. ग्लोबल वार्मिंग पायबंद घालण्यासाठी कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर जगातील सर्व देशांना भर द्यावा लागणार आहे. पॅरिस करारात याबाबतचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ ऊर्जा निर्माण करायची असेल, तर अशा ऊर्जेच्या निर्मितीसाठी लिथियम हा धातू महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे याचे साठे देशात असणे, हे निर्णायक असेल. 2015 च्या पॅरिस हवामान परिषदेत हवामानासंबंधीचे संकट टाळण्यासाठी जागतिक तापमानवाढ 2 अंशांपेक्षा कमी राहण्यासाठी तसेच ती 1.5 अंशावर यावी, यासाठी प्रयत्न करण्यासंबंधी सहमती दर्शविण्यात आली होती. भारतानेही 2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. लिथियमचे साठे या उद्दिष्टाच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला साह्याकारी ठरतील.
लिथियमची वैशिष्ट्यो
लिथियम धातू अतिशय मुलायम व नरम असा असा असतो. हा धातू साध्या चाकूनेही कापता येतो. तसेच अतिशय हलका असल्याने तो पाण्यावरही तरंगू शकतो. हलकेपणा व मुलायमता हे त्याचे बलस्थान ठरते. रासायनिक ऊर्जा साठवून तिचे विजेत ऊपांतर करू शकतो. म्हणूनच तो चार्जेबल बॅटरीमध्ये वापरला जातो.
भारतीय भूगर्भ संशोधक विभागाकडून सध्या व्यापक पातळीवर सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारने मोठी गुंतवणूकही केली आहे. जम्मू-काश्मीर राजस्थानमध्ये लिथियमचे साठे सापडल्याने विभागाच्या मोहिमेस यश मिळाले आहे. आगामी काळात अन्य ठिकाणीही साठे सापडू शकतील, अशी आशा आहे. आजच्या काळात लिथियमचे औद्योगिक मूल्य सोन्याच्या भावात आहे. पुढच्या काळातील जागतिक आर्थिक समीकरणे अशा धातूंच्या उपलब्धतेवर निर्धारीत होतील. स्वाभाविकच त्यात भारताला महत्त्वाचे स्थान असू शकेल.
सर्वेक्षणाचा धडाका
गेल्या काही वर्षात देशात लिथियम, कोबाल्ट, निकेल आणि अन्य अतिमहत्वाच्या धातूंचा शोध घेण्यासाठी भूगर्भ सर्वेक्षण विभागाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. यासाठी मोठी गुंतवणूकही केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी 100 हून अधिक शोध अभियान हाती घेण्यात येत आहेत.
राजस्थानात सापडलेला लिथियमचा साठा काश्मीरमध्ये सापडलेल्या साठ्यापेक्षाही मोठा आहे. त्याचे नेमके वजन हेतुपुरस्सर गुप्त ठेवण्यात आले आहे. आणखी व्यापक सर्वेक्षण केल्यानंतर अधिक मोठे साठे सापडू शकतील, अशी स्थिती असल्याचे भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाने स्पष्ट केले. याची किंमत अब्जावधी डॉलर्स किंवा काही लाख कोटी ऊपये असण्याची शक्यता आहे. भारत आजवर या धातूंच्या संबंधात परावलंबी होता. अद्यापही भारताला हा धातू आयात करावा लागतो. पण आता एकापेक्षा एक मोठे साठे सापडल्याने भारताचे महत्व वाढणार हे निश्चित.
लिथियमच्या शोधामुळे भारताचा ‘इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये दबदबा वाढणार
लिथियम हा दुर्मिळ धातूंपैकी एक असून सद्यस्थितीत अतिमहत्वाचा
विद्युत वाहने, मोबाईल यांच्या बॅटरीजसाठी अत्यावश्यक असा पदार्थ
इतर इलेक्ट्रॉनिक साधनांच्या निर्मितीत याची सर्वाधिक आवश्यकता
सध्या चीनची या धातूवर मक्तेदारी, भारत ती मोडण्याच्या तयारीत
– प्रशांत चव्हाण, पुणे