विजय सरदेसाई यांची भाजपवर टीका – म्हादईबाबत सरकार कर्नाटकला सामील
प्रतिनिधी /म्हापसा
राज्यातील भाजप सरकार कर्नाटकातील भाजप सरकारला सामील आहे. कर्नाटकात निवडणुका जिंकण्यास हा भाजपचा आटापिटा आहे. म्हादईबाबत न्यायालयात जाण्याची युक्ती भाजपचीच आहे. न्यायालयात केस येणारच नाही परिणामी गोमंतकीयांना पाण्यासाठी वणवण करण्याची सरकारची योजना आहे. मुख्यमंत्री गोमंतकीयांची फसवणूक करू पाहत असून राज्यातील डबल इंजिनचे सरकार पूर्णतः ढासळले आहे, असा आरोप गोवा फ्ढाŸरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.
म्हादईबाबत काँग्रेस पक्ष गंभीर नाही. काँग्रेसनेच ही सुरुवात केली. कर्नाटकमध्ये काँग्रेस क्रेडिट घेत आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत असताना जे जिंकू शकत होते. ट्रिबुनल बनविले व दिवाणी न्यायालयाने हा आदेश दिला आहे. यात दोन्ही पक्ष सामील आहेत. भाजपकडे पॉवर आहे. म्हादईबाबत पुढे कसे काय करावे, हे भाजपच ठरवित असल्याचे सरदेसाई म्हणाले.
डबल इंजिन नापास
आज डबल इंजिन काहीच भाव देत नाही मग मुख्यमंत्री कोणत्या तोंडाने त्या खुर्चीवर राहतात. आईपेक्षा म्हादई मोठी, असे मुख्यमंत्र्यांनीच म्हटले होते. याची तुम्हाला भावना नाही मग कसले हे मुख्यमंत्री, असे म्हणून मुख्यमंत्री सध्या मोठेपणा दाखवित आहेत. कर्नाटकात भाजप सरकार आहे तर गोव्याला न्याय का मिळत नाही. पाण्यासाठी न्याय मिळत नाही तर सरकारचे काय बाकी राहिले. सर्व बाबतीत राज्यात डबल इंजिन नापास झाले, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
हिंमत असेल तर 18 दिवसांचे अधिवेशन घ्या
कर्ज घेऊन सरकार सण साजरे करीत आहे. येणारे अधिवेश 4 दिवसांचेच करण्याचे ठरविले आहे. सरकारला विरोधकांना फेस करता येत नाही. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी 18 दिवसाचे अधिवेशन करून दाखवावे, असे सरदेसाई म्हणाले.
सरकारकडून लुटमार
मोपाहून बाणावलीत जाण्यास 4500 रुपये टॅक्सी भाडे आहे. टॅक्सीवाले लुटमार करीत आहे, असा आवाज करीत होते. सरकारचे 60 रुपये प्रतिकिलो मीटर टॅक्सी ऍपसाठी दर असून आज सरकार लुटमार करीत आहे. सरकार कायदेशीररित्या खंडणी मागत आहे. अशाने पर्यटक कसे येणार, अशी टीका सरदेसाई यांनी यावेळी केली.