ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेस अध्यक्षपदासाठी (congress President Election) आता दुरंगी लढत होणार आहे. झारखंडचे माजी कॅबिनेट मंत्री के. एन. त्रिपाठी (Keshari Nath Tripathi) यांचा अर्जबाद झाला आहे. त्यामुळे मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) विरुद्ध काँग्रेसमधील दुसऱ्या जी-२३ गटाचे नेते शशी थरुर (shashi Tharoor) यांच्यात सामना रंगणार आहे. मल्लिकार्जून खर्गे हे गांधी कुटुंबियांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर काँग्रेस अध्यक्षपदाचे दुसरे उमेदवार शशी थरूर यांनी सुरवातीपासूनच निवडणूक निष्पक्षपणे व्हावी, गांधी घराण्याने यामध्ये तटस्थ राहावे अशी मागणी केली आहे. तर आता शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक हे मच्यातील युद्ध नसल्याचे म्हंटले आहे.
नागपुरातील दिक्षाभूमीवर (Deekshabhoomi) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर थरूर (Shashi Tharoor) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कॉंग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख (Dr.Ashish Deshmukh) त्यांच्यासोबत होते. कॉंग्रेसने जवळपास ५१ वर्षांनंतर अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीचा उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांच्या रूपाने दिला. याबद्दल विचारले असता, ते म्हणाले, ही निवडणूक म्हणजे आमच्या सहकाऱ्यांमध्ये होत असलेली प्रक्रिया आहे. हे काही युद्ध नाही, यामध्ये कुणी शत्रू नाही. जनतेला आम्ही आमचे संकल्प सांगून जनतेचे समर्थन मिळविण्याचा आम्हा सर्वांचाच प्रयत्न आहे. शेवटी लोकांना माहिती आहे, की संकटांपासून मी कधी दूर गेलो नाही, तर त्याचा सामना केला आहे.
हे ही वाचा : के. एन. त्रिपाठींचा अर्जबाद; काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी ‘हे’ दोन नेते रिंगणात
माझ्या उमेदवारीसंदर्भात मी तिन्ही गांधींसोबत (INC) बोललो आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची (congress president election) निवडणूक निष्पक्षपणे व्हावी ही गांधी परिवाराचीही इच्छा आहे. या निवडणुकीत तेसुद्धा निष्पक्ष राहणार आहेत. यानिमित्ताने एक चांगली निवडणूक व्हावी, जेणेकरून कॉंग्रेस पक्ष मजबूत झाला पाहिजे आणि हे स्वतः आमच्या पक्षाच्या अध्यक्षा म्हणत आहेत. त्यामुळे ही निवडणूक लढण्यावरून माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचे उमेदवार खासदार शशी थरूर म्हणाले.