कसबा बीड /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संघटनेच्या वतीने सुरक्षा रक्षक कामगारांच्या मागणीसाठी बैठक बोलावून निवेदन देण्यात आले. या निवेदना पूर्वी बैठकीत कामगार भवन बांद्रा ऑफिस येथे आयोजित बैठकीमध्ये सुरक्षा रक्षकांच्या सन्मानासाठी व मागण्यांसाठी संघटना मैदानात उतरली आहे, असे सुरक्षा रक्षक संघटनेच्या अध्यक्ष अश्विनी अनिल सोनवणे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
या बैठकीत दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख शहरांच्या ठिकाणी असणाऱ्या कामगार आयुक्तांकडे निवेदन देण्यात आली. प्रामुख्याने या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 50 हजार हून अधिक सुरक्षा रक्षक कामगार कार्यरत आहेत. त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा यांच्यामध्ये होणारी कमतरता व काही प्रमुख मागण्यांसाठी हे निवेदन महाराष्ट्र राज्य कामगार भवन, बांद्रा कार्यालयात उपआयुक्त विलास बुवा यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक न्याय संघटना अध्यक्षा अश्विनी अनिल सोनावणे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कामगार उपआयुक्त विलास बुवा आध्यक्षतेखाली सर्व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष यांच्या सोबत बैठक लावण्यात आली होती.