मुंबई-चेन्नईकडे वाटचाल; अतिवृष्टीचा अभ्यास न केल्याने वाढला धोका
संतोष पाटील- कोल्हापूर
मागील काही दिवसातील ढगफुटी सदृश पावसाने कोल्हापूर शहरातील नैसर्गिक पाणी निचरा पद्धतीलाच हरताळ फासल्याने शहर जलमुखावर असल्याचा धोका ठळकपणे पुढे आला. शहरातील लहानमोठे तीनशेहून अधिक नाल्याचा नैसर्गिक प्रवाह एकतर बदलला आहे किंवा वाढत्या नागरिकरणामुळे संकुचित झाला आहे. प्रमुख 13 नाल्यांची गाळामुळे कमी झालेली रुंदी, बुजलेले लहान नाले, नागरीकरण, वाढलेली रस्त्यांची उंची, पावसाळी पाणी नियोजनाचा फज्जा, चॅनेल्स व गटारींची अपुरी क्षमता, नाले सफाईचा निव्वळ देखावा आदींमुळे महापूर न येताही तासाभराच्या पावसात रस्ते, अनेक कॉलन्यासह समतल भागातील घरात पाणी शिरत आहे. बदलत्या ऋतुमानानुसार कमी वेळात जादा पाऊस पडून पाणी-पाणी होणार हे गृहीत धरुनच नव्याने पाणी निचारा धोरण राबवण्याची आणि प्रामाणिकपणे अंमलात आणण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुंबई-चेन्नई शहरात येणऱया जलप्रयलास पावसाच्या जोडीला समुद्राच्या भरती ओहोटीची गणिते अवंबून असतात. मात्र, कोल्हापूर शहराच्या एका टोकापासून पंचगंगा नदी पात्रापर्यंत सरासरी 20 फुटांचा नैसर्गिक ढहाळ असूनही अवघ्या दोन तासांत नाल्यांचे पाणी दहा फुटांने वाढत असल्याने या समुद्र काठावरील शहरांकडे कोल्हापुरची वाटचाल सुरू आहे की काय असा प्रश्न पडत आहे. प्रशासनाच्या नोंदीनुसार शहरातील 15 पारंपरिक ठिकांणी पुराचे पाण्याचा अंदाज चुकवित अनेक कॉलन्यात पाणी साचू लागल्याने पुरसदृश स्थिती निर्माण होत आहे. गेल्या काही वर्षात शहरातील बांधकामासाठी जाणीवपूर्वक वळविलेले नाले, पुर नियंत्रण रेषलगत टाकलेले भराव, रस्ते प्रकल्पात रस्त्यांची वाढलेली उंची, नाले व नदी क्षेत्रातील बांधकामे आदीमुळे एक दोन तासाच्या पावसातही अनेक ठिकाणी रस्त्यातील घरात पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.
2009 पासून या नाल्यांना बंदिस्त करण्याच्या नादात अनेक ठिकाणी त्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलला. नाल्याचे मोठय़ा गटारीत रुपांतर झाले. परिणामी नागरीवस्तीत पाणी शिरुन जीवीत व वित्त हानीचा धोका वाढला आहे. त्यामुळेच अनेक भागात पावसाच्या पाण्याचा धोका वाढला आहे. एकात्मिक रस्ते प्रकल्पामुळे प्लिंथ लेव्हल बिघडल्याने पाणी कॉलन्यात शिरत असल्याची वस्तूस्थिती आहे. पावसाळी पाणी नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक वॉटर टेबल व रचना रस्त्यांशी संलग्नग्न नाही. जमीन, रस्ता व फुटपाथ संलग्नग्न नाहीत. अनेक वर्षात त्याच त्या रस्त्यांवर डांबर आणि क्रॉक्रिटचे थर चढवत गेल्याने रस्त्यांच्या वाढलेल्या उंचीमुळे घरे सखलात गेली आहेत. उंची वाढलेल्या रस्त्यांमुळे शहराची अनेक भागात विभागणी झाली. नैसर्गिक नाले व निचऱयातून पावसाचे जाणारे अतिरिक्त पाणी रस्त्याच्या वाढलेल्या उंचीमुळे अडविले जात आहे. रस्त्यावर पडणारे पाणी नैसर्गिकरित्या सायपन पध्दतीने जवळच्या मोठा नाला, जयंती नाल्यातून नदीपर्यंत जाणारी व्यवस्थान नष्ट झाली आहे. आहे त्या नाल्यात मोठय़ा प्रमाणात गाळ आणि कचरा साचला आहे. उघडय़ा नाल्यांची वरवर सफाई केली जाते मात्र बंदिस्त नाले खरमातीने भरले आहेत. पाणी आता घ्यायचे लांबच या नाल्यातूनच रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत असल्याचे चित्र शहरात जागो-जागी दिसते. नियोजनशुन्य कारभारामुळेच अनेक घरांत व कॉलन्यांत शिरणारे पाणी पाहून नागरिकांसाठी रोजचा पावसाचा दिवस म्हणजे महापुराची आठवण देणारा ठरत आहे.
रस्त्यांवर पाणीच पाणी
कसबा बावडा मुख्य रस्त्यालगतच्या कॉलन्या, मंडलिक पार्क, साईक्स एक्स्टेन्शन, रेल्वे स्टेशन, शिवाजी पार्क, सी वॉर्ड, लक्ष्मीपूरी, कनाननगर, ताराबाई गार्डन, शाहूपूरी, राजारामपूरी, शिवाजी उद्यमनगर, वाय. पी. पोवार नगर, यादव नगर, प्रतिभानगर, जवाहरनगर, सुभाषनगर, आदी शहराच्या कॉलन्यातील नैसर्गिक पाणी निचराच हरपला आहे. शहराच्या मध्यवस्तीतून जयंती नाला वाहतो. शहरातील साडेपाच लाख लोकसंख्येपैकी तब्बल 2 लाख 90 हजार लोकसंख्या नाल्याभोवती व परिसरात आहे. न्यू शाहूपूरी, गुलाबनगर, रायगड कॉलनी, रामानंदनगर, हॉकी स्टेडीयम, कसबा बावडय़ातील रेणुका मंदिर, आयसोलेशन हॉस्पिटल, महालक्ष्मीनगर पूल, हुतात्मा पार्क पूल परिसर, जयंती नाला परिसर, शेळके पूल परिसर, कुंभार गल्ली, विल्सन पूल, संभाजी ब्रिज परिसर, बुधवार पेठेतील काही भाग, राजहंस प्रिंटींग प्रेस परिसर, शास्त्राrनगर, आदी परिसरातील रस्ते आणि कॉलन्यात मागील काही दिवसांपासून फूट दोन फूट पाणी सहज साचत असल्याचे धोकादायक चित्र आहे.
नालेसफाई नाहीच
महापालिकेने पावसाळी नाले सफाई व स्वच्छतेची कामे पूर्ण केली नसल्याने त्याचा पाण्याच्या निचऱयावर परिणाम झाला. मोठय़ा नाल्याची सफाई केली असली तरी एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांर्तगत शहरात 98 किलोमिटरचे नाल्याती गाळ तसाच आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात खरमाती व कचरा साचल्याने अनेक ठिकाणी ते बंदच आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट सोडलेली कामे व काटकोनात वळविलेले नाले यामुळे यातून सहजरित्या पाणी वहन होत नाही. त्यामुळे सर्वच प्रमुख रस्त्यातील चौकात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले. उपयोजना कागदावरच
शहरात पावसाचे पडलेले अतिरिक्त पाणी वाहून नेणारी सक्षम यंत्रणा नाही. रस्त्यांची उंची भराव न टाकताच वाढविली गेली आहे. ही उंची वाढविताना पाण्याचा निचऱयाचा विचारच केलेला नाही. लहान गटर्सची मोठय़ा गटर्सना जोडणी सर्वात शेवटी सर्व नाले व गटर्स मुख्य नाल्याला जोडले गेलेले नाहीत. परिणामी हलक्या पावसातही मोठय़ा प्रमाणात शहरात पाणी साचत राहते. सलग लागणाऱया पावसासह ढगफुटी सारख्या समस्यांना तोड देण्यासाठी उपायोजना करणे गरजेचे असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त होत आहे.