घरगुती बियाणे उपलब्ध : लागवड क्षेत्रात वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
पारंपरिक भात लागवडीबरोबर काळय़ा तांदळाच्या भात लागवडीकडे शेतकऱयांचा कल वाढला आहे. गतवषी तालुक्यातील काही गावात काळय़ा तांदळाच्या भाताच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे यंदा काळय़ा तांदळाच्या भात लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे. आरोग्याला उत्तम असलेल्या काळय़ा तांदळाविषयी शेतकऱयांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवाय स्थानिक पातळीवर बियाणे उपलब्ध होणार असल्याने यंदाही काळय़ा तांदळाचे भातपीक डोलणार आहे.
भाताचे अनेक प्रकार असून अलीकडे काळा तांदूळ प्रसिद्धीस आला आहे. शिवाय स्थानिक शिवारात काळय़ा तांदळाचे उत्पादन होऊ लागले आहे. गतवषी मोजक्मयाच गावांतून दिसून आलेले काळय़ा तांदळाचे भातपीक यंदा सर्वत्र पसरणार आहे. गतवर्षी हिंडलगा, जाफरवाडी, सांबरा आणि कणबर्गी भागातील शेतकऱयांनी काळय़ा तांदळाचे उत्पादन घेतले होते. दरम्यान, 600 रुपये किलो दराने बियाणे शेतकऱयांनी विकत घेतले होते. मात्र, यंदा शेतकऱयांनी स्वतःच बियाणे ठेवले असल्याने पेरणी करणे सोयीस्कर होणार आहे. शिवाय काळय़ा तांदळाचे क्षेत्रही वाढणार आहे. शेतकरी बासमती, दोडगा, सोनम, शुभम, इंद्रायणी या आधुनिक बियाणांबरोबर काळय़ा भाताची पेरणीही करणार आहेत. बाजारपेठेत काळय़ा तांदळाला अधिक मागणी आणि दरही आहे. त्यामुळे काळा तांदूळ उत्पादनाला शेतकऱयांनी पसंती दिली आहे. पारंपरिक भात पिकाबरोबर 110 दिवसात उत्पादन देणारे हे काळे भात आहे. अनेक औषधी गुणधर्म असणाऱया काळय़ा तांदूळ भाताची यंदाच्या खरीप हंगामात पेरणी होणार आहे.
काळय़ा तांदळाकडे शेतकऱयांचा ओढा
आरोग्यास उत्तम मानल्या जाणाऱया काळय़ा भाताच्या तांदळाची तालुक्यात लागवड गतवर्षापासून होत आहे. पारंपरिक भातपिकाबरोबर काळय़ा तांदळाचेही उत्पादन होत आहे. शिवाय या तांदळाला भावही समाधानकारक असल्याने शेतकऱयांचा ओढा वाढला आहे.