ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या इस्लामिक संघटनेकडून केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नेत्यांच्या जिवाला धोका असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेनेच्या अहवालात समोर आलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने आरएसएसच्या पाच नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे.
22 सप्टेंबर रोजी केरळमधील पीएफआय सदस्य मोहम्मद बशीर यांच्या घरावर एनआयएने छापेमारी केली होती. त्याच्या घरात आरएसएस नेत्यांची यादी मिळाली, यामध्ये आरएसएसच्या 5 नेत्यांच्या हत्येचा कट होता. यासंदर्भात अधिक तपास केल्यानंतर केरळमधील आरएसएसचे नेते पीएफआयच्या निशाण्यावर असल्याचा अहवाल एनआयएने केंदीय गृहमंत्रालयाला पाठवला. त्यानंतर केंद्र सरकारने तात्काळ संबंधित पाच नेत्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. या नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आता त्यांच्या सुरक्षेत निमलष्करी दलाचे कमांडो तैनात करण्यात येणार आहेत.
अधिक वाचा : देशात आजपासून 5G सेवेला सुरूवात, 4G च्या तुलनेत 10 पट वेगवान
गृह मंत्रालयाच्या वाय दर्जाच्या सुरक्षेत एकूण 8 सुरक्षा कर्मचारी असतात. यामध्ये ज्या व्हीआयपीला सुरक्षा दिली जाते, त्याच्या घरी 5 सशस्त्र स्टॅटिक गार्ड बसवले जातात. तसेच, तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षा देतात.