काँग्रेस पुरस्कृत इंडिया या आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून सरकारला पावसाळी अधिवेशनात घेरण्याचा प्रयत्न केला आहे. गेले काही दिवस मणिपूर राज्यात चाललेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभुमीवर इंडिया या आघाडीने मोदी सरकारवर सातत्याने आरोप करून ते मणिपूरमध्ये सरकर पुर्ण अपयशी आणि निष्क्रिय ठरल्याचा आरोप केला आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरवर का भाष्य करत नाहीत याचा जाब विचारून मोदी सरकारला काही प्रश्न विचारले. पावसाळी अधिवेशनात गौरव गोगोई यांनी मोदी सरकारविरोधा अविश्वास ठराव मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीन प्रश्न विचारले आहेत.
पहिल्यांदा नुकतेच आपली खासदारकी परत मिळवलेले काँग्रेस नेते राहूल गांधी अविश्वास ठराव मांडणीच्या सुरवातीला बोलतील असे सांगितले असतानाच अचानक खासदार गौरव गौगई यांनी ठरावाला बोलण्याची सुरवात केली. त्याला भाजपच्या खासदारी आक्षेप घेतला. बऱ्याच गोंधळानंतर सभापतींनी खासदार गोगोई यांना बोलण्याची परवानगी दिली.
खासदार गौरव गोगोई आपल्या भाषणाच्या सुरुवातीला संसदेत बोलताना ते म्हणाले, “इंडिया अलायन्सचा अविश्वास प्रस्तावाला संपुर्ण पाठिंबा असून आमचा नाईलाज झाल्यामुळेच आम्हाला हा अविश्वास प्रस्ताव संसदेत आणावा लागला. इथे मुद्दा संसदेतील आमच्या संख्याबळाचा नसून मणिपूरसाठीच्या हक्कासाठी तसेच न्यायासाठीचा मुद्दा आहे. मणिपूरचा तरुण वर्ग, मुली, शेतकरी, विद्यार्थी न्याय मागत असल्यानेच इंडिया आघाडीनं मणिपूरच्या भवितव्यासाठीच हा प्रस्ताव आणला आहे.”असे ते म्हणाले.
आपल्या प्रस्ताविकेत त्यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करतानात पंतप्रधानांना तीन प्रश्न विचारले गेले. पहिला प्रश्न विचारताना ते म्हणाले; “पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत मणिपूरला का गेले नाहीत ? राहुल गांधी गेले, इंडिया अलायन्सचे नेते गेले. पण देशाचे प्रमुख या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी का नाही गेले?” असा प्रश्न त्यांनी विचारला.
आपल्या दुसरा प्रश्न अधोरिखित करताना ” पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मणिपूरसाठी कोणतीही संवेदनशीलता व्यक्त झाली नाही. किंवा कोणत्याच प्रकारची भावना व्यक्त झाली नाही. मणिपूरवर बोलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ८० दिवस का लागले? आणि तेही फक्त ३० सेकंदच. असं का ?” असाही प्रश्न त्यांनी विचारला.
शेवटचा आणि तिसरा प्रश्न विचारताना गौरव गौगई म्हणाले, “पंतप्रधानांनी गुजरातच्या निवडणूकीवेळी अनेकदा मुख्यमंत्रीपद बदलले. त्याच प्रकारचा निर्णय मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत का घेतला नाही. त्यांना या दंगलीच्या पार्श्वभुमीवर पदावरून का हटवलं जात नाही ? तसेच उत्तराखंडमध्ये निवडणुका तोंडावर आल्यावर तब्बल चार वेळा मुख्यमंत्री बदलण्यात आले. त्रिपुरातही निवडणुकांआधी असेच मुख्यमंत्री बदलण्यात आले. त्यामुळे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांवर पंतप्रधानांचा एव्हढा वरदहस्त का आहे?” असा शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला.