पर्यावरण, अर्थव्यवस्था, जीवनमान उद्ध्वस्त लुईझिन फालेरो यांची टिका
प्रतिनिधी /पणजी
गोवा हा शांतता, निसर्गमयतेचे निवास्थान म्हणून ओळखले जाते. भाजप व काँग्रेस या दोन्ही सरकारांच्या अपयशामुळे गोव्याचे पर्यावरण अर्थव्यवस्था आणि जीवनमान उद्ध्वस्त झाले आहे. असे तृणमूलचे राष्ट्रीय उपाध्यक्षक व राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी सांगितले. गोवा हे कोळशाचे ठिकाण नसून पर्यावरणाचे ठिकाण आहे. रेल्वे मार्गाच्या दुहेरी टॅकिंगला कोणी मंजूरी दिली, बेळगाव महामार्गाच्या विस्तारीकरणाला कोणी मान्यता दिली. असे प्रश्नि फालेरो यांनी उपस्थित केले आहे.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत फालेरो बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत महिला विभागाच्या उपाध्यक्ष प्रतिभा बोरकर, आणि सरचिटणीस विजय पै उपस्थित होते. मोले येथील तीन रेषीय प्रकल्प रद्द करण्यच्या दिशेने तृणमूल काँग्रेस कनिष्ठपणे काम करेल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने टिकाऊ पर्यायाचा शोध घेईल. तृणमूलने जाहीर केलेल्या जाहिरनाम्याच्या मुद्यावर तात्काळ कारवाई करेल. असे आश्वासन देताना फालेरो म्हणाले की हे प्रकरण ते राज्यसभेत मांडतील. सरकार स्थापन झाले की म्हादईचे पाणी वळवण्याच्या न्यायाधिकरणाच्या निर्णयाला आव्हान दिले जाईल आणि म्हादईच्या पाण्यावरील गोव्याचा हक्क कायम ठेवला जाईल असे ही फालेरो म्हणाले.
प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाबाबत गोव्याची खराब कामगिरी अधोरेखीत करताना फालेरो म्हणाले की कचरा प्रकल्पाच्या नावाने कोटय़ावधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. साळगाव येथील एक कचरा प्रकल्प सोडल्यास कचरा प्रकल्प कुठे आहे ते भाजपाने दाखवावे. राज्यातीत अधिकाधिक सांडपाणी नद्यामध्ये जात आहे. नदीतील प्रदुषण वाढत असून त्याचा परीणाम सर्वसामान्य लोकांवर होत आहे.
तृणमूल सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक कार्यक्षम कचरा संकलन यंत्रणा आणि राज्यव्यापी सांडपाणी जाळे स्थापन करण्याची खात्री करेल याशिवाय स्वच्छ आणि कचरामुक्त गोवा सुनिश्चित करू त्यासाठी एकात्मिक कचरा व्यवस्थापन प्रणाली स्थापन करणार असल्याचेही फालेरो यांनी सांगितले.