प्रतिनिधी / बार्शी
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी बार्शी शहर आणि तालुक्यांमध्ये करण्यात येत असणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी आज बार्शी शहर पोलीस ठाणे येथे सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी भेट दिली असता त्याठिकाणी पत्रकारांशी वार्तालाप करत असताना त्यांनी शक्यतो नियम पाळून सर्व बाजारपेठ खुली करा असे आवाहन केले तर जनता कर्फ्यु शक्यतो टाळा असे आवाहन असे आवाहन केले. कारण जनता कर्फ्यू संपल्यानंतर बाजारामध्ये गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे त्यामुळे शक्यतो जनता कर्फ्यु टाळावा असे मनोज पाटील यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्पष्ट केले की बाजारामधील गर्दी हटवण्याचे काम जरी पोलीस प्रशासनाचे असले तरी एखाद्या दुकानात गर्दी होत असेल तर तशी फिर्याद किंवा तक्रार स्थानिक स्वराज्य संस्थेने करणे गरजेचे आहे तसेच बार्शी तालुक्यातून इतर तालुक्यात कामासाठी जाणारे खाजगी आणि सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना तात्काळ बंद करावे त्यांना फक्त एक वेळ जाण्यास किंवा येण्यास परवानगी द्यावी आणि जर या नियमांचे पालन होत नसेल तर संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी बार्शी शहर आणि तालुका पोलीस यांना दिले.
बार्शी तालुक्यात जर कोणी अवैध दारू, गुटका, तंबाखू किंवा इतर बंदी असणारे पदार्थ कोण विकत किंवा बाहेरून आणत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. आपल्या राज्यातील लॉकडाऊन दिनांक17 रोजी संपत असून यापुढे लॉकडाऊन वाढला तर त्याच्याकडे येणारी आदेश आणि निर्बंध पाहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी बार्शी शहर पोलिस निरीक्षक संतोष गिरी गोसावी बार्शी तालुका पोलीस निरीक्षक गिरीश देशपांडे बार्शी पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर मोरे हे उपस्थित होते