ऑनलाईन टीम / यंगून :
म्यानमारमधील लष्कराच्या बंडानंतर आश्रय घेण्यासाठी भारताच्या ईशान्येकडील राज्यात आलेल्या आठ पोलीस अधिकाऱ्यांना परत पाठवावे, अशी विनंती म्यानमारने मिझोराम सरकारला केली आहे.
मिझोरमच्या चम्पई जिल्ह्याचे उपायुक्त मारिया सिटी जुआली यांनी आपल्याला म्यानमारच्या फालाम जिल्ह्यातल्या आयुक्तांकडून यासंदर्भात पत्र आल्याचे एका वृत्तसंस्थेला सांगितले.
म्यानमार सरकारने या पत्रात म्हटले आहे की, ‘दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवण्यासाठी भारतात सीमा पार करून आलेल्या आठ पोलीस अधिकाऱ्यांना आमच्या हवाली करावे.’
एका वृत्तसंस्थेनुसार, लष्कराचे आदेश मान्य करायला नकार देऊन म्यानमारच्या 8 पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंबीय अशा एकूण 30 जणांनी भारतात आश्रय घेतला आहे.