बेळगाव : शाहूनगर येथील वीज दुर्घटनेत बळी पडलेल्या राठोड कुटुंबीयांची बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी रविवारी भेट घेतली. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून मयतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये जिल्हा प्रशासनाकडून मिळवून दिले. त्या कुटुंबाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अधिकची नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे त्यांनी सांगितले. शनिवारी शाहूनगर येथील एका बांधकामावर असलेल्या लोखंडी खांबात विजेचा प्रवाह उतरून तिघा जणांचा मृत्यू झाला. हिराप्पा राठोड, शांतव्वा राठोड व अन्नपूर्णा राठोड या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी असून आमदार राजू सेठ यांनी कुटुंबाची भेट घेतली. यावेळी हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंता ए. एम. शिंदे, सेक्शन ऑफिसर पवनकुमार यांच्यासह इतर उपस्थित होते. घटनेची माहिती घेण्यासाठी रविवारी हेस्कॉमचे व्हिजिलियन्स पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
Previous Articleगोकाकात विद्युत पंपसेट चोरणाऱ्यांना अटक
Next Article टोमॅटो घसरला… कांदा वाढला
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.