शिरोळ प्रतिनिधी
गेल्या पाच वर्षांमध्ये उत्पादन खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्या पटीने उत्पादित मालाला भाववाढ झालेली नाही जेमतेम 30 टक्के वाढ झाली आहे सध्या शेती तोट्यात आहे शेतकऱ्याच्या उत्पादित मालातून वेगवेगळ्या रूपाने लाखो रुपये कर रूपाने केंद्र शासनाला महसूल मिळत असताना हा पैसा जातोय कुठे याचा जाब विचारण्यासाठी शेतकरी जनजागृती अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘दैनिक तरुण भारत’ अशी बोलताना दिली.
ते म्हणाले की येत्या एक जुलै ते 30 सप्टेंबर अखेर शेतकरी जनजागृती अभियान सुरू येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबविण्यात येणार आहे गेल्या पाच वर्षांमध्ये रासायनिक खताचे भरमसात दर वाढले आहेत विजेचे दर वाढले आहेत तसेच अन्य घटकांनीही दरवाढ केल्याने शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाही तसेच योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे ऊस कापूस कडधान्य यास अन्य उत्पादित मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांच्या मला बद्दल दरवाढीचा पुनर्विचार करावा यासह अन्य मागण्यासाठी आपण खास प्रयत्न करीत आहोत तसेच याबाबत शेतकऱ्यांच्या मध्ये जनजागृती व्हावी या हेतूने हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले की याबाबतची माहिती पुस्तिका काढण्यात येणार आहे या माहिती पुस्तके च्या माध्यमातून जमाखर्चाचा ताळमेळ कसा घालायचा याचा जाब राज्यकर्त्यांना विचारणार असल्याचे त्यांनी सांगून सध्या बदली प्रकरणांमध्ये लाखो रुपयाची मागणी होते यावर आळा घालण्यासाठी शासनाने काही निर्बंध व कायदा करणे गरजेचे आहे यासाठी आपण खास प्रयत्न करणार असल्याचे राजू