बेळगाव : लोकमान्य ग्रंथालयाच्या बुक लव्हर्स क्लबतर्फे ‘प्लास्टिकरहीत आयुष्य’ या विषयावर डॉ. आरती भंडारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाची झालेली हानी सोदाहरण स्पष्ट केली. यावेळी बोलताना आरती भंडारे म्हणाल्या, ‘निसर्गाशी असलेली आपली नाळ घट्ट रहावी म्हणून आठ वषर्पूंर्वी ‘अमूल्य बुंद’ या संस्थेमार्फत प्लास्टिकरहीत आयुष्य हा उपक्रम चालविला. आपल्या पुढील पिढीसाठी आपण पैसा, संपत्ती ठेवून जातो. पण स्वच्छ पाणी, हवा व सुपीक जमीनच जर ठेवली नाही तर त्या संपत्तीचा काय उपयोग? असे भयानक सत्य त्यांनी मांडले. आज आईच्या दुधातून प्लास्टिकचे बारीक कण असतील, समुद्रातील कासवाच्या नाकात स्ट्रॉची काडी असेल तर परिस्थितीची जाणीव होणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट केले. आरती आपटे यांनी परिचय करून देत त्यांचे स्वागत केले. यावेळी बुक लव्हर्सचे सदस्य उपस्थित होते.
Previous Articleपालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना रोटरी साऊथतर्फे मदत
Next Article अभियांत्रिकी शिक्षणाला चांगले दिवस
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.