म्हैसाळ वार्ताहर
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरज तालुक्यातील नरवाड(लक्ष्मीनगर) येथे “मूठभर धान्य आणि घोटभर पाणी” उपक्रम राबविण्यात आला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असुन पशुपक्ष्यांचे अन्नपाण्याविना हाल होऊ नये. पशुपक्षी हे निसर्गातील महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना वाचविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. निसर्ग मंडळ सांगली जिल्हा ही या उपक्रमात सहभागी असून असे विविध प्रकारचे पर्यावरण विषयक उपक्रम राबविले जात आहे.
यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष प्रदीपराव खोचगे म्हणाले “निसर्गाचे संवर्धन करणे व पर्यावरण वाचवणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.निसर्गाच्या अन्नसाखळी कायम टिकवण्यासाठी पशुपक्षांचा मोलाचा वाटा आहे.ते वाचतील तर आपण वाचू यासाठी वृक्षलागवड सह पशुपक्षांची अस्तित्व टिकवून ठेवणे आवश्यक आहे.
यावेळी नवनाथ लाड सर यांची निसर्ग मंडळाच्या राज्य कार्यकारिणीवर संघटक पदी निवड झाले बदद्दल ,राज्य सल्लागार पदी सिध्दलिंग स्वामी सर व जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड प्रदिपराव खोचगे पाटील यांची निवड झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.