खानापूर : राष्ट्रीय सेवा संघाच्यावतीने विजयादशमीनिमित्त रविवारी खानापूर शहरात पथसंचलन करण्यात आले. स्वामी विवेकानंद हायस्कूल येथून या पथसंचलनाला सुरुवात झाली. शहरातील विविध मार्गावरुन पथसंचलन करण्यात आले. पथसंचलनाच्या स्वागतासाठी रस्ते रांगोळी घालून सजवण्यात आले होते. तर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येत होते. शहरात 12 वर्षानी आरएसएसचे दिमाखदार आणि भव्य तसेच शिस्तबद्ध असे पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात तालुक्यातून शेकडो स्वयंसेवक सहभागी झाले होते. पथसंचलनानंतर झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हभप शशिकांत गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर श्रीकांत कुलकर्णी यांनी बोलताना विजयादशमी आणि नवरात्रोत्सव हजारो वर्षापासूनची परंपरा आपण जपत आलो आहोत. मानव जीवन हे विविध रसानी भरलेली असते. नवरात्रोत्सव म्हणजे शक्तीच्या संचयाची प्रक्रिया आहे. यातून स्त्री शक्ती जागृत होते. आणि स्त्री शक्तीचा सन्मान आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यानंतर देशातील नागरिकांना अनुशासनाचे धडे मिळावे यासाठी संघाच्यावतीने पथसंचलन केले जाते. इतरवेळी होणारे संचलन आणि दसऱ्यावेळी होणारे संचलन यात फरक असतो, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
Previous Articleखानापूर तालुक्यात 21 नोव्हेंबरपासून भगवद्गीता अभियान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.