Uday Samant News
ठाकरे गटातील 13 तर राष्ट्रवादीमधील 20 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. असा खळबळजनक दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यामुळे आता नव्या राजकीय चर्चेलाउधाण आलं आहे.काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील काही आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी “या चिमण्यांनो परत या “अशी साद घातली आहे असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी पुण्यामध्ये केलं होत. यानंतर राज्यामध्ये बरीच चर्चा रंगली होती. या चर्चाना प्रत्युत्तर सामंत यांनी दिलं आहे.
नवी मुंबईतील खारघर येथील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरुन हटवले जाईल अशी चर्चा रंगत असतानाच उदय सामंत यांनी खळबळजनक दावा केला आहे. राज्यात मुख्यमंत्री बदलाबदल चर्चा सुरु आहे. याबाबत सामंत यांना प्रश्न विचारला असता अशा अनेक चर्चा असल्याचे सांगत ठाकरे सेनेतील उरलेले 13 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीचे 20 आमदार आणि काँग्रेसचे बडे नेते देखील शिंदेंच्या संपर्कात आहेत.तर काँग्रेसच्या बड्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर येथे भेट घेतल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला आहे.