ऑनलाईन टीम/तरुण भारत
अवकाळी पाऊस आणि वातारणातील बदलामुळे डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. सध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने याचा फटका डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. उन्हामुळे बागांचे नुकसान होणार आहे. तर वाढत्या उन्हामुळे बागा सुकू लागल्या आहेत. त्यामुळे उपाययोजना करून बागा वाचविणे शेतकऱ्यांसमोर आव्हान आहे.
मराठावाड्यात ढगाळ वातावरण असले तरी उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा ताव वाढला आहे. त्यामुळे डाळिंब बागांचे नुकसान होणार असे दिसत आहे. उन्हामुळे पिकांवर चट्टे पडतात, तर काढणी योग्य तयार झालेले पीक ठिकवून ठेवण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे हातातोंडाला आलेलं पीक हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
वाढत्या उन्हाचा धोका काय…?
सध्या राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामासह फळ पिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. डाळिंबाचा हंगाम संपला असून छाटणी कामे पूर्ण झाली आहेत. अशा अवस्थेत पाणी पुरवठा वेळेत झाला तरच उत्पादनात वाढ होणार आहे. पण सध्याच्या वाढत्या उन्हामुळे बागा सुकू लागल्या आहेत तर दुसरीकडे पाणीपातळी ही झपाट्याने खलावत आहे.
अंतिम टप्प्यात बागा टिकवण्याचे आव्हान…
डाळिंब बाग अंतिम टप्प्यात आहेत. मध्यन्तरी अवकाळी पाऊस, कीड रोगराईचा प्रादुर्भाव यातून शेतकऱ्याने पिकाचा बचाव केला. मात्र आत कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. जर उन्हाचा पारा ४० ते ४४ अंशापर्यंत गेला तर, मात्र बागांवर नेट आच्छादन गरजेचे आहे.तसेच बाग वाचविण्यासाठी सुधारित पद्धतीच्या आच्छादनाचा वापर करता येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
बाग वाचविण्यासाठी उपाययोजना….
आता वाढत्या उन्हामुळे डाळिंब बागा धोक्यात आल्या आहेत. शिवाय यावर कोणताच पर्याय शेतकऱ्यांना काढता आला नाही. किमान आगामी उत्पादनावर याचा परिणाम होऊ नये म्हणून काही शेतकरी शक्कल लढवत आहेत. हिंगोली तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी असे काय जुगाड लावले आहे की पंचक्रोशीत त्याची चर्चा होऊ लागली आहे.काही शेतकऱ्यांनी फळाना क्रॉप कव्हरचे अच्छादन केले आहे. तसेच काही काही शेतकऱ्यांनी डाळींब पिकांना साड्यांचे अच्छादन केले आहे. तर त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून वाढलेल्या उन्हामुळे डाळिंब उत्पादकांवर बाग नष्ट होण्याची वेळ आली आहे. शिवाय पाणी पातळीतही घसरण झाल्याने बागा जोपासणे जिकिरीचे झाले आहे. बागांचे संरक्षण करण्यासाठी जुन्या साड्या, कपडे यांचा वापर करावा लागणार आहे. बाष्पप्रतिरोधक फवारण्या केल्यास पाणी टिकून राहण्यास मदत होणार आहे. फळांवर कापड, कागदांचा वापर करावा लागणार आहे. तर तर झाडांना रात्रीचे पाणी द्यावे लागणार आहे.