प्रतिनिधी / सिंधुदुर्ग
दोडामार्ग तालुक्यातील पतपेढी शाखेतील अपहाराला तत्कालीन जिल्हा संचालक ही जबाबदार असल्याचा आरोप परिवर्तन पॅनल ने भाग्यलक्ष्मी पॅनलच्या टीकेला उत्तर देताना केला आहे , परिवर्तन पॅनल ची लढाई ही विचारांची लढाई आहे. त्यामुळे भाग्यलक्ष्मी पॅनल चा धुवा उडवून प्रार्थमिक शिक्षक पतपेढीवर परिवर्तनाचा ध्वज निश्चितपणे फडकविणार असल्याचा विश्वास परिवर्तन पॅनल ने व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक 14 मे रोजी होत आहे भाग्यलक्ष्मी आणि परिवर्तन पॅनल अशा दोन पॅनल खाली जिल्ह्यातील 14 संघटना एकत्र येऊन दुरंगी पद्धतीने ही निवडणूक लढवत आहेत. भाग्यलक्ष्मी पॅनल ने पत्रकार परिषदेतून अनेक मुद्द्यांवर आरोप करीत सडकून टीका केली. परिवर्तन पॅनल मधील सहभागी संघटना प्रतिनिधींनी एकत्र येत पत्रकार परिषदेतून याचा समाचार घेतला. आहे. यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्त सरचिटणीस म . ल देसाई ,जिल्हाध्यक्ष राजा कविटकर ,जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे, परिवर्तन पॅनल प्रवक्ता केटी चव्हाण, प्राथमिक शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे ,पुरुषोत्तम शेंडे .,गणेश नाईक ,संजय जाधव ,सचिन जाधव ,संदीप देसाई आदी उपस्थित होते. ध्यास परिवर्तनाचा मालक सभासदांच्या हिताचा हे ब्रीद घेऊन या निवडणुकीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद बहुजन शिक्षक कर्मचारी महासंघ, कस्त्राइब कर्मचारी महासंघ ,प्राथमिक शिक्षक संघटना ,महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती ,महाराष्ट्र राज्य दिव्यांग शिक्षक संघटना,सत्यशोधक शिक्षक संघटना, या संघटनांनी एकत्र येत परिवर्तन सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान भाग्यलक्ष्मी पॅनल ने दोडामार्ग पतपेढी शाखा कार्यालयात अनेक वर्षांपूर्वी झालेल्या अपहरणाबाबत अखिल शिक्षक संघाच्या संचालकांवर आरोप केला आहे . मात्र जिल्ह्यातील सर्व शाखांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या जबाबदारी जिल्हा कार्यालयाची होती त्यामुळे जिल्ह्यातील तत्कालीन सर्वच संचालक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे . मात्र निवडणूक काळात जाणीवपूर्वक अपप्रचार केला जातो ही पद्धत चुकीची आहे त्यावेळी जिल्हा दोन कर्मचारी यांच्यावरही कारवाई झाली होती. सहकारात जबाबदारी सामूहिक असते हे सोयीस्कर रित्या सांगितले जात नसल्याचे स्पष्ट केले. सगळा कारभार ओरोस इथून चालतो शिवाय त्यानंतर झालेल्या दोन निवडणुकांमध्ये अखिल संघाचा उमेदवार निवडून आला भ्रष्टाचार केला असता तर मतदारांनी पुन्हा संधी दिली असती काय असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे .तसेच भ्रष्टाचाराचा आरोप असेल तर युतीसाठी हात का पुढे केला होता असाही सवाल केला आहे.केवळ दोन संघटनांच्या मताने पतसंस्था बिनविरोध होत नाही जिल्ह्यातील सर्व संघटनांना समाविष्ट करून प्रत्येकाला एक एक संचालक पद देणे आवश्यक होते दोन संघटनांची युती झाली असती तर अज्ञात 13 संघटनांचे काय हा विचार होणे ही आवश्यक होते .आणि या मुद्द्यावर बिनविरोधाचा मुद्दा बिघडला होता सत्ताधारी यांना सत्तेचा मोह असून सत्तेसाठी दिशाभूल करू नये. तीन ते चार वर्षे राहिलेल्या उमेदवार यांना उमेदवारी देताना त्यांचा अभ्यास आणि अनुभव लक्षात घेण्यात आला आहे काही वर्षांपूर्वी सत्ताधारी फायनल मधील एका बुजुर्ग संचालकाने मुदतपूर्व राजीनामा दिला, होता तेव्हा त्या ठिकाणी पोट निवडणूक घेतली गेली होती का हे ध्यानात घेणे आवश्यक होते असे स्पष्ट केले . याशिवाय अनेक मुद्दे हे अडचणीचे आहेत त्यामुळे एकदा परिवर्तन कडे सत्ता द्या असे आवाहन म.ल देसाई यांनी केले.
परिवर्तन सहकार पॅनलचे उमेदवार
तालुका मतदार संघ धर्मराज धूरत देवगड ,दिनकर केळकर वैभववाडी, रवींद्र जाधव कणकवली, राजाराम कविटकर कुडाळ, सागर कानजी वेंगुर्ला, जिल्हा मतदार संघ-अनुसूचित जाती जमाती मनोज कुमार अटक, जिल्हा सर्वसाधारण पुरुष- अरविंद पाळेकर ,अशोक साळुंखे देशमुख, जिल्हा सर्वसाधारण महिला नेहा सावंत, संचिता सावंत ,इतर मागासवर्ग संतोष कोचरेकर ,भटक्या जाती विमुक्त जमाती विशेष मागास वर्ग अनिल वरक,
वचननामा
जामीन तारण कर्ज मर्यादा तीस लाखापर्यंत आठ टक्के व्याजदराने करणे गृह धारण कर्ज 80 अंतर्गत आयकर सवलतीचा लाभ मिळवून देणे दैनिक भत्ता व प्रवास भत्ता न घेण्याचा संचालकांचा संकल्प पतपेढी कायमस्वरूपी क्लीन कॅश क्रेडिट मुक्त ठेवणे , बँकिंग सुविधा करण्याचा संकल्प सभासदांना गंभीर आजार व अपघात यासाठी सुलभ आकस्मिक कर्ज देणे ,व कर्ज मर्यादा रुपये एक लाख करणे सभासदांच्या आकस्मिक मृत्यू नंतर मिळणाऱ्या वारस संरक्षण निधी २० लाखांपर्यंत वाढवून त्वरित वितरण करणार गुणवंत पाल्यांच्या पारितोषिक रकमेत आकर्षक वाढ करणे. पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी विशेष शैक्षणिक कर्ज मर्यादा वाढवणे मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याचा प्रयत्न करणे. ब वर्ग सभासदांना त्यांच्या निवृत्तीवेतनानुसार कर्ज सुविधा उपलब्ध करणे. दरवर्षी किमान 15 टक्के पर्यंत लाभांश देण्याचा मानस मालक सभासदांसाठी आकर्षक दाम दुप्पट ठेव योजना आणली संस्थेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी नियोजन पूर्वक प्रयत्न करणे अनावश्यक स्थावर मालमत्ता व सुशोभीकरण यावर मर्यादा आणणे . नवनियुक्त सहाय्यक शिक्षकांना त्वरित सभासदत्व व कर्ज उचल सुविधा देणे मातृ सन्मान योजनेअंतर्गत प्रसूती खर्चासाठी एक लाखापर्यंत कमी व्याजदरात विशेष कर्ज योजना मुलांसाठी दत्तक पालक योजना अतिशय काटकसरीने पारदर्शक व स्वच्छ कारभार करून मालक सभासदांना जास्तीत जास्त दर्जेदार व सुलभ पद्धतीने सेवा पुरवण्यासाठी कटिबद्ध.