पब्लिक फर्स्टच्या अहवालात माहिती उघड : ग्राहकांचे केले समाधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सन 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या खजिन्यात एकटय़ा उबर कंपनीने 44 हजार 600 कोटी रुपयांची भर घातली असल्याची माहिती आहे. वाहन भाडेतत्वावर देण्याचा कंपनीचा व्यवसाय आहे.
कंपनीने सदरच्या वर्षात उत्तम व्यवसाय साध्य केल्याचा यावरून दाखला मिळतो. 2021 मध्ये कंपनीने एकूण 1.5 ट्रिलियन इतके ग्राहक जोडले आहेत. भारताच्या एकूण जीडीपीतील वाटय़ात उबरचे प्रमाण हे 0.80 टक्के इतके भरते.
चालकांची प्राप्ती
उबर आपल्या चालकांना ‘ड्रायव्हर पार्टनर्स’ असे संबोधते. ज्यांनी वर्षामध्ये सर्वाधिक अतिरिक्त 1700 कोटी रुपयांची प्राप्ती प्राप्त केली आहे. इतर कामाच्या पर्यायापेक्षा या चालक व्यवसायातून 49 टक्के अधिक उत्पन्न प्राप्त करण्यात उबरला यश आले आहे.
उबरच्या चालकांची देशभरात 6 लाख इतकी संख्या आहे. बहुतेक 96 टक्के उबर वापरकर्त्यांनी सेवेबाबत समाधान व्यक्त केले आहे. सामान्यतः वर्षभरात उबर चालकांनी 16.8 कोटी तास वाचवले आहेत. उबरची ही भाडेतत्वावरची वाहतूक टॅक्सी सेवा किफायतशीर ठरली असल्याचे प्रतिसादावरून स्पष्ट होते. वरील माहिती ही रिसर्च फर्म पब्लिक फर्स्ट यांनी नुकतीच दिली आहे.
सेवेत केला आवश्यक बदल- प्रथजीत सिंग
भारताच्या आर्थिक खजिन्यात 44 हजार कोटी रुपयांचे योगदान देण्यातले समाधान काही औरच आहे, अशी प्रतिक्रिया कंपनीचे भारत व दक्षिण आशिया अध्यक्ष प्रथजीत सिंग यांनी दिली आहे. प्रत्येक वाहनाच्या वाहतूक सेवेत बदलासह ग्राहकांचे समाधान करणे हेच कंपनीचे ध्येय असल्याचे ते म्हणाले.