ऑनलाईन टीम / तरुण भारत :
उद्धव ठाकरे हे खरे खोकेबहाद्दर आहेत. मंत्रिपदासाठी ते आमदारांकडून पैसे घेत होते. जे पैसे देऊ शकले नाहीत त्यांना मंत्रिपदावरून कसे काढले हे मला माहिती आहे, असा खळबळजनक आरोप शिदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
केसरकर म्हणाले, ठाकरे कुटुंबाबद्दल मला आदर आहे. मी कधीही त्यांच्याबद्दल बोलत नाही. पण जेव्हा नैतिकता सोडली जाते. तेव्हा लोकांच्या संयमांचा बांधही तुटतो. तो उद्धव ठाकरेंनी तुटू देऊ नये. तुटल्यास त्यांच्या अनेक गोष्टी जनतेसमोर येतील. उद्धव आणि आदित्य ठाकरे वारंवार आम्हाला खोकेबहाद्दर म्हणतात. पण खरे खोकेबहाद्दर तेच आहेत. मंत्रिपदांसाठी ते आमदारांकडून पैसे घेत होते. मुंबईचा पैसा कुणी लुटला हे जनतेला माहिती आहे. सत्ता त्यांच्या डोक्मयात गेली होती. आता सत्ता गेल्यानंतर त्यांचा थयथयाट सुरू आहे.
संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, राऊत हे ठाकरे कुटुंबाशी नव्हे तर शरद पवार यांच्याशी प्रामाणिक आहेत. ते राष्ट्रवादीसाठी काम करतात. शिवसेना फोडण्याचे काम त्यांना देण्यात आले होते, ते त्यांनी पूर्ण केले.