ओटवणेतील तेरेखोल नदीपात्रातील घटना
विद्युतभारीत वीज वाहिनी तुटून ओटवणे गवळीवाडी येथील विनय विष्णू कोटकर वय (१४) या शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे घटना गुरुवारी सायंकाळी उशिरा घडली. ओटवणे – बावळाट सीमेदरम्यानच्या तेरेखोल नदी पात्रात ही घटना घडली.
ओटवणे हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत असलेला विनय हा नदीपलीकडे गेलेल्या म्हशी आणण्यासाठी गेला असताना साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजताच ओटवणेसह बावळाट गावावर शोककळा पसरली. दोन्ही गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आंबोली पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर रात्री शव विच्छेदनासाठी मृतदेह सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे.