म्हापसा : सांखळी नगरपालिकेसाठी 5.30 वा. प्रचार संपला. 2012 पासून भाजप सरकार राज्यात सुरू आहे तेव्हापासून आजपर्यंत फसवेगिरी सुरू आहे. खाणबाबत तर आजही जनतेची फसवणूक होत आहे. तेथे लोकांना डॉ. प्रमोद सावंत ज्यांचा मतदारसंघ 80 टक्के खाण मालकांचा आहे. तेथेही खोटारडेपणा करण्यास डॉ. प्रमोद सावंत मागे राहिले नाही. असे कित्येक प्रश्नावर फसवेगिरी सुरू आहे. या ना त्या कारणावर बदली करण्यात येईल असे सांगून मतदारावर सांखळीत दडपण सुरू आहे. असा आरोप सांखळी काँग्रेस गटाध्यक्ष मंगलदास नाईक यांनी म्हापसा उत्तर गोवा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी व्यासपीठावर युवा अध्यक्ष अंकुश कामत, रमेश सिनारी उपस्थित होते. पुढे बोलताना मंगलदास नाईक म्हणाले की, आज विरोधकांचा प्रचार आहे तो भय घालणे, सरकारी नोकर बोलला तर बदली करण्याची धमकी अशा प्रकारे होत असून सांखळीत भाजपने आजवर दडपण आणण्याचा प्रचार चालविला असल्याची माहिती यावेळी गटाध्यक्ष नाईक यांनी दिली. लोकांना आव्हान करण्यास येते की पंचायत पालिका यांचा लोकप्रतिनिधी येथून संधी मिळते तोही हक्क भाजपने हिरावून घेतला. पक्षाच्या बॅनरखाली लोकांवर दडपण येत आहे. सांखळी मित्रमंडळी आहे त्यांनी भाजपने सुडाचे राजकारण आणले आहे. ते बंद पाडा व स्वच्छ चारित्र्यवान तुम्हाला मदत करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या. भाजपची हुकूमशाही चालली ती संपवा व दडपणशाही थांबवा असे आवाहन यावेळी मंगलदास नाईक यांनी केले.
सर्वत्र भरघोस प्रतिसाद लाभला- अंकुश कामत
आज दडपणाखाली राजकारण चालले आहे. आज भीती वाटते घरोघरी भांडणे होणार नाही ना? आज आम्ही भाजपच्या प्रचारासाठी बाहेर पडलो नाही तर आमचा सूड घेण्यात येईल असे लोक आम्हाला सांगत आहे. आमच्या चुका झाल्या आहेत हे लोक मान्य करीत आहे. सर्वत्र आमच्या काँग्रेसच्या उमेदवारांना भरघोस प्रतिसाद लाभला. सर्व लोक आमच्याबरोबर असून जे काही मतदान होणार ते काँग्रेसलाच होणार असे युवा काँग्रेस अध्यक्ष अंकुश कामत यांनी सांगितले.