What about our wasted day?
हैदराबाद, बंगळुरु, गोरखपूर, लखनऊमधील पर्यटकांचा सवाल
मालवणात जलपर्यटनास येत असताना संबंधित जलपर्यटन व्यावसायिकांची कागदपत्रे पूर्ण केली आहेत की नाही हे आम्हाला अजिबात माहिती नव्हते. बंदर विभागाने कारवाई केल्यानंतर आज या गोष्टीची कल्पना आम्हाला आली. यात आमचा वेळ वाया गेलाच. शिवाय आम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय. येथे प्रश्न पैशाचा नाहीय. कारवाईमुळे पर्यटनाचा आनंद घेता आला नाहीय आणि आमचा आजचा पूर्ण दिवसही फुकट गेला, अशी खंत हैदराबाद, बंगळुरु, गोरखपूर आणि लखनऊ येथून आलेल्या पर्यटकांनी व्यक्त केली. या पर्यटकांना गोव्यातून एजंटमार्फत आणण्यात आले होते.
मालवण / प्रतिनिधी