वृत्तसंस्था/ ढाका
या महिन्याच्या अखेरीस भारताचा महिला क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका उभय संघांत होणार आहे. 28 एप्रिल ते 9 मे या कालावधीत ही मालिका होईल.
बांगलादेश क्रिकेट मंडळाने दिलेल्या वेळापत्रकानुसार भारतीय महिला संघ 23 एप्रिल रोजी बांगलादेशमध्ये दाखल होईल आणि 10 मे रोजी मायदेशी प्रयाण करेल. या मालिकेतील पहिला सामना 28 एप्रिल रोजी होईल 30 एप्रिल रोजी दुसरा सामना दिवस-रात्रीचा खेळविण्यात येईल. त्यानंतरचे सामने 2, 6 व 9 मे रोजी खेळविले जातील. यातील शेवटचा सामना डे-नाईट सामना असेल. मालिकेतील सर्व सामने सिल्हेतमध्ये खेळविले जातील.