राज्यात उष्णतेची लाट अन् वणव्यांचा वाढता धोका, वन्यजीव संरक्षणासाठी वन, वन्यजीव विभाग सक्रीय, चारा, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी नागरी वस्तीकडे, वणवे, वन्यजीवांचा फोटो वापरावा, ही विनंती.
कृष्णात पुरेकर कोल्हापूर
गेल्या काही वर्षात वाढलेला उन्हाळ्याने यंदा फेब्रुवारीतच धोक्याचा इशारा दिला. अन् मार्चमध्ये तापमानवाढीचे संकेत दिले. गेल्या दोन वर्षात वणव्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्याच्या वनक्षेत्रातील वन्यजीवांवर या तापमानवाढीचा परिणाम होत आहे. जिल्ह्यात गतवर्षी वणव्याच्या 10 घटना घडल्या होत्या. मार्चमधील तापमानवाढीचा इशारा पाहता यंदा वणव्यांच्या संख्येत वाढ होण्याचा धोका आहे. शुक्रवारी 3 मार्च या 50 व्या जागतिक वन्यजीव दिनाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांसमोरील या संकटांवर चर्चा होत आहे.
राज्यातील वनक्षेत्रात 2021 च्या फेब्रुवारीत वणव्याच्या 39 घटना घडल्या होत्या. गतवर्षी फेब्रुवारीत 95 ठिकाणी वणवे लागले होते. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या या आकडेवारीने वणव्यांमुळे होणाऱ्या वन्यजीवांच्या हानीवर प्रकाश टाकला आहे. वैश्विक तापमानवाढीचा हा धोका यंदाही जाणवू लागला आहे. मार्चच्या पहिल्या दोन दिवसांत वाढलेले तापमान पाहता राज्यासह जिल्ह्यात वनक्षेत्रात वणव्यांची संख्या वाढण्याची भीती वाढत आहे. गतवर्षी जिल्ह्यात वणव्यांच्या सुमारे 10 घटना नोंद आहेत. त्यातून जंगलातील आगी, वणव्यांमुळे वन्यसंपत्तीचे मोठे नुकसान हेत असल्याची माहिती वन विभागाने दिली.
वन विभागाकडे वणवे नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणा आहे. केंद्रीय वन, पर्यावरण विभागाकडून संचलित सेन्सर यंत्रणा कार्यरत आहे. उपग्रहांशी जोडलेल्या या सिस्टीममुळे वणवा लागताच त्याची माहिती केंद्रीय वन विभागाच्या नियंत्रण केंद्राला मिळते, अन् तेथून ती राज्याच्या अन् जेथे वणवा लागला आहे, त्या स्थानिक वनाधिकाऱ्यांना लगेच संदेशाद्वारे त कळवले जाते. मोडीस अर्थात मॉडरेट रिसॉल्युशन इमेजिंग स्पेक्ट्रो रेडिओ मीटर यंत्रणेतील सेंन्सरने आजपर्यत देशभरात 3 लाख 45 हजार 989 वणवे स्पॉट निश्चित केले आहेत. त्यापैकी 52 हजार 785 वणवे या यंत्रणेने नियंत्रणात आणण्यात यश मिळवले आहे.
फेब्रुवारीतच उन्हाचा तडाका वाढला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागातील वन्यप्राणी वनक्षेत्रातून नागरी वस्तीकडे आल्याच्या घटना घडल्या आहेत, घडत आहेत. जिल्ह्यातील काही गावांत गेल्या दोन दिवसांत गव्यांच्या कळपांचे दर्शन घडले आहे. याला कारण त्यांची वाढती संख्या अन् धोक्यातील अधिवास आहे. वनक्षेत्रातील गावांत गव्यांसह अन्य वन्यप्राण्यांचे सातत्याने होणारे दर्शन हे याचे संकेत आहेत. वैश्विक तापमानवाढीच्या परिणामांवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त वनीकरणावर वन विभागाने भर दिला आहे.
युनेस्कोने जागतिक वन्यजीव दिन 50 वर्षांपुर्वी 1973 मध्ये याची घोषणा झाली होती. गेल्या 50 वर्षांत नामशेष होणाऱ्या जगभरातील 50 हजारांहून अधिक वन्य पशुपक्ष्यांसह वनस्पतींच्या प्रजाती वाचवण्यात त्यांचे संवर्धन करण्यात यश आले आहे. यंदाचा हा सुवर्णमहोत्सवी वन्यजीव दिन आहे. या पार्श्वभूमीवर वन्यजीवांना वाचवान जैवविविधत साखळी अधिक मजबूत करा, या संकल्पनेवर विविध उपक्रम शुक्रवारी राज्यभर राबवण्यात येत आहेत. वैश्विक तापमानीमुळे संकटात सापडलेले वन्यजीव चारा, पाण्याच्या शोधात नागरी वस्तीकडे येण्याचा धोका वाढला आहे. त्यांच्या संरक्षणासाठी वन, वन्यजीव विभागाची यंत्रणा सक्रीय झाली आहे.